शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतीकामासाठी बळीराजा घेतोय गाढवाची मदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 13:20 IST

माळशिरस तालुक्यातील चित्र; सर्वत्र दलदल असल्याने वाहने चालेनात; मजुरांचाही अभाव 

ठळक मुद्देपरतीचा पाऊस लांबल्यामुळे लागवड झालेल्या उसाच्या मशागती लांबल्या पिकांना खत घालण्यासाठी सध्या मजुरांची उणीव भासत असल्यामुळे गाढवांची मदतपिकांमध्ये यंत्रांऐवजी गाढवांकडून खत टाकण्यासाठी शेतकºयांची पसंती

माळशिरस : ‘अडला नारायण धरी गाढवाचे पाय’ हे दादा कोंडके यांच्या या गाण्याप्रमाणे मजुरांअभावी शेतकरी सध्या शेतीकामांसाठी गाढवांची मदत घेत आहेत. एक-दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे पेरणी, खुरपणी, खत घालणे, पिकांची आंतरमशागत करणे आदी शेतीच्या कामांची मोठी धांदल उडाल्याचे दिसत आहे.

या काळात मजूर मिळणे मुश्कील होऊ लागल्याने शेतकरी अडला आहे. मात्र यांंत्रिकीकरणाबरोबरच प्राण्यांची मदत घेऊन शेतकरी आपले काम भागवताना दिसत आहेत. पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या शेतातील विविध कामांसाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे. वाफसा येताच गहू, मका, ज्वारी या पिकांची पेरणी करावी लागणार आहे. सध्या असलेल्या पिकांची आंतरमशागत लांबल्यामुळेही कामांची धांदल उडाल्याचे दिसत आहे. यासाठी मजुरांची चणचण भासू लागल्याचे सर्वत्र चित्र आहे.

अडचणीच्या काळात गाढवाची लाखमोलाची साथ- गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाशी सामना करणाºया शेतकºयाला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. याबरोबरच पिकांचा बेभरवसा, बाजारभाव, साखर कारखानदारांची ढासळलेली स्थिती, दुबार पेरणीचे संकट अशा अनेक समस्यांचा बोजा घेऊन शेतकरी सध्या शेती करीत आहेत. यातच मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे पुन्हा नवे संकट शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी शेतीपूरक व्यवसायांचा आधार घेत शेतीला अर्थकारणाची जोड देत आहेत. यामुळे सध्यातरी अडलेल्या शेतकºयाला गाढवाने लाखमोलाची साथ दिली आहे.

पूर्वी जड वस्तूंची वाहतूक करण्यासाठी गाढवांचा सर्रास वापर होत होता. मात्र यात आधुनिक यंत्रांचा वापर सुरू झाल्याने गाढवाकडून कामाचे स्वरूप वेगळे करून त्यातून उदरनिर्वाह करावा लागत आहे. पिकांमध्ये यंत्रांऐवजी गाढवांकडून खत टाकण्यासाठी शेतकºयांची पसंती आहे. त्यामुळे डाळिंब, ऊस यासह वेगवेगळ्या पिकांमध्ये खत टाकण्यासाठी गाढवांना मोठी मागणी आहे.- मºयाबा काळे, गाढव मालक 

यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यामुळे लागवड झालेल्या उसाच्या मशागती लांबल्या आहेत. त्यामुळे उसाच्या पिकावरही परिणाम झाला आहे. वाढ खुंटली आहे़ या पिकांना खत घालण्यासाठी सध्या मजुरांची उणीव भासत असल्यामुळे गाढवांच्या मदतीने बांधावरील खत थेट पिकापर्यंत पोहोचविणे सोपे जाते.- दीपक वाघमोडे,शेतकरी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी