शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
5
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
6
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
7
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
8
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
9
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
10
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
11
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
12
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
13
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
14
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
15
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
16
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
17
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
18
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
19
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
20
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर

आता शेतीकामासाठी बळीराजा घेतोय गाढवाची मदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 13:20 IST

माळशिरस तालुक्यातील चित्र; सर्वत्र दलदल असल्याने वाहने चालेनात; मजुरांचाही अभाव 

ठळक मुद्देपरतीचा पाऊस लांबल्यामुळे लागवड झालेल्या उसाच्या मशागती लांबल्या पिकांना खत घालण्यासाठी सध्या मजुरांची उणीव भासत असल्यामुळे गाढवांची मदतपिकांमध्ये यंत्रांऐवजी गाढवांकडून खत टाकण्यासाठी शेतकºयांची पसंती

माळशिरस : ‘अडला नारायण धरी गाढवाचे पाय’ हे दादा कोंडके यांच्या या गाण्याप्रमाणे मजुरांअभावी शेतकरी सध्या शेतीकामांसाठी गाढवांची मदत घेत आहेत. एक-दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे पेरणी, खुरपणी, खत घालणे, पिकांची आंतरमशागत करणे आदी शेतीच्या कामांची मोठी धांदल उडाल्याचे दिसत आहे.

या काळात मजूर मिळणे मुश्कील होऊ लागल्याने शेतकरी अडला आहे. मात्र यांंत्रिकीकरणाबरोबरच प्राण्यांची मदत घेऊन शेतकरी आपले काम भागवताना दिसत आहेत. पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या शेतातील विविध कामांसाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे. वाफसा येताच गहू, मका, ज्वारी या पिकांची पेरणी करावी लागणार आहे. सध्या असलेल्या पिकांची आंतरमशागत लांबल्यामुळेही कामांची धांदल उडाल्याचे दिसत आहे. यासाठी मजुरांची चणचण भासू लागल्याचे सर्वत्र चित्र आहे.

अडचणीच्या काळात गाढवाची लाखमोलाची साथ- गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाशी सामना करणाºया शेतकºयाला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. याबरोबरच पिकांचा बेभरवसा, बाजारभाव, साखर कारखानदारांची ढासळलेली स्थिती, दुबार पेरणीचे संकट अशा अनेक समस्यांचा बोजा घेऊन शेतकरी सध्या शेती करीत आहेत. यातच मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे पुन्हा नवे संकट शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी शेतीपूरक व्यवसायांचा आधार घेत शेतीला अर्थकारणाची जोड देत आहेत. यामुळे सध्यातरी अडलेल्या शेतकºयाला गाढवाने लाखमोलाची साथ दिली आहे.

पूर्वी जड वस्तूंची वाहतूक करण्यासाठी गाढवांचा सर्रास वापर होत होता. मात्र यात आधुनिक यंत्रांचा वापर सुरू झाल्याने गाढवाकडून कामाचे स्वरूप वेगळे करून त्यातून उदरनिर्वाह करावा लागत आहे. पिकांमध्ये यंत्रांऐवजी गाढवांकडून खत टाकण्यासाठी शेतकºयांची पसंती आहे. त्यामुळे डाळिंब, ऊस यासह वेगवेगळ्या पिकांमध्ये खत टाकण्यासाठी गाढवांना मोठी मागणी आहे.- मºयाबा काळे, गाढव मालक 

यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यामुळे लागवड झालेल्या उसाच्या मशागती लांबल्या आहेत. त्यामुळे उसाच्या पिकावरही परिणाम झाला आहे. वाढ खुंटली आहे़ या पिकांना खत घालण्यासाठी सध्या मजुरांची उणीव भासत असल्यामुळे गाढवांच्या मदतीने बांधावरील खत थेट पिकापर्यंत पोहोचविणे सोपे जाते.- दीपक वाघमोडे,शेतकरी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी