शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
2
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
3
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
4
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
5
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
6
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
7
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
8
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
9
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
10
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
11
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
12
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
13
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
14
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
15
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
17
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
18
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
19
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
20
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश

डोंबिवलीत कोसळली इमारत

By admin | Updated: July 5, 2017 06:28 IST

आयरे रोडवरील गंगाराम सदन या धोकादायक इमारतीचा एक भाग मंगळवारी दुपारी कोसळून भुईसपाट झाला. या घटनेत जीवितहानी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : आयरे रोडवरील गंगाराम सदन या धोकादायक इमारतीचा एक भाग मंगळवारी दुपारी कोसळून भुईसपाट झाला. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. यामुळे कल्याण-डोंबिवली शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या इमारतीचा दुसरा भाग रिकाम करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. आयरे रोडवर गंगाराम सदन ही दुमजली इमारत होती. तिला लागून याच इमारतीचा चार मजल्याचा आणखी एक भाग आहे. त्यातील दोन मजल्याची इमारत दुपारी एकच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली. इमारतीत तीन कुटुंबे राहत होती. तळमजल्यावर इस्त्रीचे दुकान होते. कुटुंबातील व्यक्ती काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या, तर इमारत पडण्याच्या आवाजाने इस्त्रीवाल्याने पळ काढल्याने तोही बचावला. ही इमारत ४० वर्षापूर्वी बांधली होती. ती गंगाराम केणे सदन या नावानेही ओळखली जाते. ही इमारत धोकादायक असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पण याच इमारतीच्या शेजारचा चार मजली इमारतीचा भाग मात्र धोकादायक नसल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. पण नंतर हा चार मजली भागही रिकामा करण्यास सांगण्यात आले. कल्याण-डोंबिवलीत ५०२ धोकादायक इमारती आहेत. त्यातील २०२ इमारती अतिधोकादायक आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त घरत यांनी दिली. धोकादायक इमारत दुरुस्ती करण्यायोग्य असल्यास दुरुस्तीचा प्रस्ताव महापालिकेला सादर केल्यास दुरुस्तीची परवानगी दिली जाईल. तशी नसल्यास इमारतीच्या पुनर्बांधणीला मंजूरी दिली जाईल, असे घरत म्हणाले.पालिकेचा क्लस्टर प्रस्ताव फेटाळलामहापालिकेने राज्य सरकारकडे पाठवलेल्या क्लस्टरच्या प्रस्तावात नॅशनल बिल्डींग कोड न टाकल्याने हा प्रस्ताव फेटाळला जाईल, असा आरोप कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे पदाधिकारी सुनील नायक यांनी केला. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी मात्र पालिकेने क्लस्टर विकास योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्याचे सांगितले. पालिकेने क्लस्टरला मंजुरी देताना नॅशनल बिल्ंिडग कोडचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आहे. त्यामुळे या योजनेच्या मंजूरीत त्रूटी राहून त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळणार नाही, असे पत्र नायक यांनी पाठवले. क्लस्टर विकास योजना मंजूर करताना पालिकेने नागरिकांच्या हरकती सूचना घेतल्या नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिटहोत नसल्यास पालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्या-विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत राघवेंद्र सेवा संस्थेने २०१५ साली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर पुढील सुनावणी दोन महिन्यात अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.