शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

उद्धव ठाकरे पक्ष चालवतात की संजय राऊत?; जिल्हाप्रमुखाचा थेट सवाल, प्रकरण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:25 IST

स्वबळाचा पक्षाचा आदेश पाळेल परंतु ज्यापद्धतीने जे बाहेरचे लोक पक्षात आले त्यांचा मानसन्मान होतो, निष्ठावंतांना डावलले जाते. त्यामुळे ते शिवसैनिक नाराज आहेत असं जिल्हाप्रमुखांनी सांगितले.

नागपूर - संजय राऊत हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्षाची भूमिका मांडत असतात परंतु ते अशी काही वक्तव्ये करतात ज्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत की नाही, पक्ष उद्धव ठाकरे नाही तर संजय राऊत चालवतात अशी विधाने ते करतात अशा शब्दात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी राऊतांवर निशाणा साधला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एका मुलाखतीत किशोर कुमेरिया म्हणाले की, संजय राऊत नागपुरात आले आणि स्वबळाची घोषणा केली. नागपूर शहरातील कुठल्याही जुन्या शिवसैनिकाशी त्यांनी चर्चा किंवा बैठक घेतली नाही. मी नागपूरमध्ये एकमेव शिवसेनेचा ४ टर्म नगरसेवक निवडून आलो आहे. मी जिल्हाप्रमुख आहे. पक्षाचे नेते म्हणून संजय राऊतांना वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. परंतु जुन्या शिवसैनिकाशी चर्चा करणे असं काही पक्षात होत नाही. त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. निष्ठावान आणि कर्मठ शिवसैनिक पक्ष सोडून गेले. मी ज्या भागातून निवडून आलो, तिथे जनता माझ्यावर प्रेम करते. ४ वेळा नगरसेवक बनवले. मी महानगरप्रमुख असताना ९ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २००७ पासून २०२२ पर्यंत माझ्यावर कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच २०२२ मध्ये माझ्याकडे जिल्हाप्रमुख देण्यात आले त्यावेळी ज्या भागातून मी निवडून येतो तो विधानसभा मतदारसंघ माझ्याऐवजी दुसऱ्याच्या ताब्यात दिला जे ५ पक्ष बदलून आलेत. निष्ठावान आणि सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतोय. मातोश्रीवर अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु चर्चाही नाही, भेटही नाही. अद्याप त्यावर तोडगा नाही. शिवसैनिक पक्षाच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. स्वबळाचा पक्षाचा आदेश पाळेल परंतु ज्यापद्धतीने जे बाहेरचे लोक पक्षात आले त्यांचा मानसन्मान होतो, निष्ठावंतांना डावलले जाते. त्यामुळे ते नाराज आहेत. सरकार असताना ३०-३५ वर्ष काम करणाऱ्याला काहीच मिळाले नाही जे मिळाले ते बाहेरच्या लोकांना दिले असं जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊत नागपूरात आले, एका जिल्हाप्रमुखाशी चर्चा, समन्वय साधला आणि मी दुसरा जिल्हाप्रमुख असताना मला बोलावले नाही. चर्चा नाही. जुन्या शिवसैनिकांना बोलावले नाही. त्यामुळे ती नाराजी आणि खंत आमच्या मनात आहे. १५ वर्षाने मला जिल्हाप्रमुखपद दिले. त्यानंतर एक महिन्यातच ज्या विधानसभेच्या वार्डातून मी ४ वेळा निवडून आलो तेच माझ्या ताब्यातून काढून घेतले. ५ पक्ष बदलून आलेल्यांना ती विधानसभा दिली याची खंत आहे. मी सातत्याने उद्धव ठाकरेंना परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट झाली नाही आणि चर्चा नाही असंही किशोर कुमेरिया यांनी म्हटलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत