शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे पक्ष चालवतात की संजय राऊत?; जिल्हाप्रमुखाचा थेट सवाल, प्रकरण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:25 IST

स्वबळाचा पक्षाचा आदेश पाळेल परंतु ज्यापद्धतीने जे बाहेरचे लोक पक्षात आले त्यांचा मानसन्मान होतो, निष्ठावंतांना डावलले जाते. त्यामुळे ते शिवसैनिक नाराज आहेत असं जिल्हाप्रमुखांनी सांगितले.

नागपूर - संजय राऊत हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्षाची भूमिका मांडत असतात परंतु ते अशी काही वक्तव्ये करतात ज्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत की नाही, पक्ष उद्धव ठाकरे नाही तर संजय राऊत चालवतात अशी विधाने ते करतात अशा शब्दात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी राऊतांवर निशाणा साधला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एका मुलाखतीत किशोर कुमेरिया म्हणाले की, संजय राऊत नागपुरात आले आणि स्वबळाची घोषणा केली. नागपूर शहरातील कुठल्याही जुन्या शिवसैनिकाशी त्यांनी चर्चा किंवा बैठक घेतली नाही. मी नागपूरमध्ये एकमेव शिवसेनेचा ४ टर्म नगरसेवक निवडून आलो आहे. मी जिल्हाप्रमुख आहे. पक्षाचे नेते म्हणून संजय राऊतांना वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. परंतु जुन्या शिवसैनिकाशी चर्चा करणे असं काही पक्षात होत नाही. त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. निष्ठावान आणि कर्मठ शिवसैनिक पक्ष सोडून गेले. मी ज्या भागातून निवडून आलो, तिथे जनता माझ्यावर प्रेम करते. ४ वेळा नगरसेवक बनवले. मी महानगरप्रमुख असताना ९ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २००७ पासून २०२२ पर्यंत माझ्यावर कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच २०२२ मध्ये माझ्याकडे जिल्हाप्रमुख देण्यात आले त्यावेळी ज्या भागातून मी निवडून येतो तो विधानसभा मतदारसंघ माझ्याऐवजी दुसऱ्याच्या ताब्यात दिला जे ५ पक्ष बदलून आलेत. निष्ठावान आणि सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतोय. मातोश्रीवर अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु चर्चाही नाही, भेटही नाही. अद्याप त्यावर तोडगा नाही. शिवसैनिक पक्षाच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. स्वबळाचा पक्षाचा आदेश पाळेल परंतु ज्यापद्धतीने जे बाहेरचे लोक पक्षात आले त्यांचा मानसन्मान होतो, निष्ठावंतांना डावलले जाते. त्यामुळे ते नाराज आहेत. सरकार असताना ३०-३५ वर्ष काम करणाऱ्याला काहीच मिळाले नाही जे मिळाले ते बाहेरच्या लोकांना दिले असं जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊत नागपूरात आले, एका जिल्हाप्रमुखाशी चर्चा, समन्वय साधला आणि मी दुसरा जिल्हाप्रमुख असताना मला बोलावले नाही. चर्चा नाही. जुन्या शिवसैनिकांना बोलावले नाही. त्यामुळे ती नाराजी आणि खंत आमच्या मनात आहे. १५ वर्षाने मला जिल्हाप्रमुखपद दिले. त्यानंतर एक महिन्यातच ज्या विधानसभेच्या वार्डातून मी ४ वेळा निवडून आलो तेच माझ्या ताब्यातून काढून घेतले. ५ पक्ष बदलून आलेल्यांना ती विधानसभा दिली याची खंत आहे. मी सातत्याने उद्धव ठाकरेंना परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट झाली नाही आणि चर्चा नाही असंही किशोर कुमेरिया यांनी म्हटलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत