शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

अण्णांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:35 IST

दीड किलो वजन घटले; सरकारकडून दोन दिवसांत दखल नाही

राळेगणसिद्धी : उपोषणामुळे अण्णा हजारे यांचे वजन पहिल्या दोन दिवसातच दीड किलोने घटले आहे. वयामुळे अण्णांचा रक्तदाबही अनियमित असल्याने त्यांनी जास्त काळ उपोषण करणे धोक्याचे आहे, असा सल्ला डॉक्टरांच्या पथकाने गुरुवारी दिला. अण्णा मात्र उपोषणावर ठाम आहेत. पहिल्या दोन दिवसात अण्णांशी सरकारकडून कुणीही संपर्क केलेला नाही. जिल्ह्यातील स्थानिक प्रशासकीय अधिकारीही राळेगणकडे फिरकलेले नाहीत.लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, राज्यांमध्ये लोकायुक्ताचा कायदा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या मागण्यांसाठी अण्णांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे. यादवबाबा मंदिरात हे उपोषण सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन हे अण्णांच्या आंदोलनात शिष्टाई करत होते. मात्र, दिल्लीबाबत काहीच निर्णय घेऊ शकत नसल्याने त्यांना शिष्टाईसाठी येण्यासही अण्णांनी व गावकऱ्यांनी नकार दिला.अण्णांचे दोन दिवसातच १ किलो ७०० ग्रॅम वजन घटले आहे. अण्णा सध्या ८१ वर्षांचे आहेत. अण्णांनी तीन दिवसांपेक्षा अधिक काळ उपोषण केल्यास त्यांच्या अवयवांना गंभीर धोका पोहोचू शकतो, असे डॉ. पोटे यांनी सांगितले. अण्णांना मौन पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण बोलण्यानेही त्यांच्यातील शक्ती कमी होत आहे.सरकार लोकशाहीचा गळा घोटतेय : अण्णा हजारेजनलोकपालच्या मागणीसाठी देशभर विविध राज्यात आंदोलने सुरु होत आहे. मात्र, सरकार या आंदोलकांवर दडपशाही करुन आंदोलने दडपत आहे, असे अण्णा म्हणाले. अण्णांच्या पाठिंब्यासाठी १५ राज्यात ३५ ठिकाणी आंदोलने सुरु झाली आहेत. तसेच राज्यात २५ जिल्ह्यांच्या ठिकाणी व वेगवेगळ्या ७३ गावांमध्ये गुरुवारी आंदोलन झाले, अशी माहिती भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या वतीने देण्यात आली.मुंबईतील डब्यावाल्यांचाही पाठिंबाआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील डब्यावाल्यांनीही पुढाकार घेतला आहे़ डब्यावाल्यांच्या मुलांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांची भेट घेतली़हजारे यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह भेटणारनाशिक : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी पुन्हा जातानाच मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन जाणार असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले. अण्णांच्या ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. अण्णांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही महाजन यांनी केले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेBJPभाजपा