शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

बनायचे होते डॉक्टर, झाले अभिनेत्री

By admin | Updated: January 13, 2015 00:09 IST

सावंतवाडीत वार्तालाप : रोहिणी हट्टंगडी यांनी उलगडला जीवनप्रवास

सावंतवाडी : मला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचे होते. पण वडिलांचे क्षेत्र अभिनयाचे असल्याने मी या क्षेत्रात आले. कोणतेही काम करा, पण शिक्षण पूर्ण करा, असा सल्ला अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी दिला. त्या श्रीराम वाचन मंदिरात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होत्या. त्यांची प्रा. अरुण पणदूरकर यांनी मुलाखत घेतली. मला खरा ब्रेक थ्रू मिळाला तो ‘मंतरलेले पाणी’ नाटकातील सखीच्या भूमिकेतून, असे सांगत त्यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. माझे वडील अभिनय क्षेत्रात असल्याने मला लगेच संधी मिळाली. यानंतर मी माझे करियर सुरू केले. जागतिक पातळीवरील रंगभूमी कोर्स ३ वर्षे केला. घरातूनही वडिलांचा पाठींबा होता. यामुळे मी १९७६ मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर आले. २५ फेब्रुवारी १९७६ मध्ये पहिले नाटक ‘कस्तुरी मृग’ केले. हे नाटक कठीण होते. या नाटकात सतरा बायका व दोन पुरुषांचा समावेश होता. वडिलांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या रोजच्या रिहर्सल्समुळे मी नाटक क्षेत्रात सहज प्रगती केली. नाटकासाठी वडिलांचे मला कायम सहकार्य होते. ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबांची भूमिका केली होती. यावेळी मला वडिलांचाही विरोध होता. तरीसुध्दा मी हट्ट धरून काम केले. नाट्य क्षेत्रापासून मी कधीही दूर गेले नाही. नाटकाची ओढ पहिल्यापासूनच होती. गांधी फिल्ममधील कस्तुरबा ही भूमिका ५५ वर्षांच्या बाईची होती. यावेळी मी ३० वर्षांची होते. तरीही एक म्हातारी बाई म्हणून अगदी सहजपणे ही भूमिका मी साकारली होती. परंतु यानंतर माझ्यावर ५५ वर्षांची बाई असाच शिक्का बसला आणि मला बाईच्या भूमिका कराव्या लागल्या. (वार्ताहर)काळजाला भिडेल  तोच अभिनयहिंदी चित्रपटातील कलाकारांना थिएटरचा टी माहीत नसतो. कारण यांनी कधीही थिएटरमध्ये काम केलेले नसते. आम्हाला प्रत्येक सीरियलमध्ये काम करण्यासाठी अलर्ट रहावे लागते. कारण ७५ चा भाव पाचव्या क्रमांकावर आणता येत नाही. मात्र, हिंदी चित्रपटात हे शक्य असते, असे सांगून अभिनय हा अभिनय असतो. मला खरा अभिनय, खोटा अभिनय असे कोणालाही सांगायचे नाही. परंतु काळजाला भिडेल, तोच अभिनय, असेही स्पष्ट केले.