शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

चंद्रपूरमधील २२० वाघांना घर देता का घर?; स्थलांतर, कॉरिडोर सुरक्षा हेच पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 23:49 IST

२०१८ च्या व्याघ्रगणनेनुसार राज्यात ३१२ पैकी १७५वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.

गजानन दिवाणऔरंगाबाद : महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे २२० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. निम्मेच वाघ संरक्षित क्षेत्रात आहेत. अशा स्थितीत मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याचा धोका आहे. यावर आता चारच पर्याय मला दिसतात. अधिवास क्षेत्रातील गावांचे स्थलांतर करून वाघांचे भक्ष्य वाढविणे, वाघांच्या मार्गातील (कॉरिडोरमधील) अडथळे दूर करणे किंवा वाघांचे स्थलांतर करणे. हे शक्य न झाल्यास शेवटी वाघांच्या संख्येवर नियंत्रणाचा पर्यायदेखील विचारात घ्यावाच लागेल, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केले.

चंद्रपूरच्या संरक्षित क्षेत्रात व त्याबाहेर किती वाघ आहेत?२०१८ च्या गणनेनुसार राज्यात ३१२ वाघ असून, यातील अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे १६० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. अर्धे म्हणजे ८० वाघ ताडोबा अंधारी या संरक्षित क्षेत्रात असून, उर्वरित ८० वाघ बाहेर आहेत. इथे प्रजनन क्षमता असलेल्या ६३ वाघिणी आहेत. साधारण दोन ते तीन वर्षांनंतर वाघीण बछड्यांना जन्म देते. या गणितानुसार २०१८ नंतर जिल्ह्यात किमान ६० ते ७० वाघांची संख्या वाढू शकेल. म्हणजे सध्या या जिल्ह्यात २२० ते २३० वाघ असू शकतात.

हे वाघ सुरक्षित आहेत का?ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ सुरक्षित आहेतच. मात्र, अर्धे वाघ या प्रकल्पाबाहेर आहेत. इथे शेती, गावे व जंगल असल्याने या परिसरात वाघ आणि माणसाचा संपर्क येतो. अशा स्थितीत नवे क्षेत्र शोधून वाघ इतर ठिकाणी स्वत: स्थलांतरित होतात. ताडोबाच्या दोन्ही बाजूंनी तसे झालेदेखील आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी परिसरात आधी सहसा वाघ दिसत नव्हता. आता तिथे वाघांचे नियमित दर्शन होऊ लागले आहे. मात्र, संरक्षित क्षेत्राबाहेर वाढलेल्या वाघांमुळे माणसांचा होणारा मृत्यू हा प्रश्न गंभीर होत चालला आहे.2018च्या व्याघ्रगणनेनुसार राज्यात ३१२ पैकी १७५वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. दोन वर्षांत यात ५० वाघांची भर पडली आहे. देशभरात संरक्षित क्षेत्राच्या बाहेर १००० वाघ आहेत. ११० एकट्या चंद्रपूरात आहेत. 56% वाघ हाच राज्यातील एकमेव जिल्हा सांभाळतो आहे.  6.09 वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रती चौरस कि.मी. क्षेत्रात आढळतात. मेळघाटात हेच प्रमाण अवघे १.४९ आहे.

टॅग्स :Tigerवाघ