शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

चंद्रपूरमधील २२० वाघांना घर देता का घर?; स्थलांतर, कॉरिडोर सुरक्षा हेच पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 23:49 IST

२०१८ च्या व्याघ्रगणनेनुसार राज्यात ३१२ पैकी १७५वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.

गजानन दिवाणऔरंगाबाद : महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे २२० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. निम्मेच वाघ संरक्षित क्षेत्रात आहेत. अशा स्थितीत मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याचा धोका आहे. यावर आता चारच पर्याय मला दिसतात. अधिवास क्षेत्रातील गावांचे स्थलांतर करून वाघांचे भक्ष्य वाढविणे, वाघांच्या मार्गातील (कॉरिडोरमधील) अडथळे दूर करणे किंवा वाघांचे स्थलांतर करणे. हे शक्य न झाल्यास शेवटी वाघांच्या संख्येवर नियंत्रणाचा पर्यायदेखील विचारात घ्यावाच लागेल, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केले.

चंद्रपूरच्या संरक्षित क्षेत्रात व त्याबाहेर किती वाघ आहेत?२०१८ च्या गणनेनुसार राज्यात ३१२ वाघ असून, यातील अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे १६० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. अर्धे म्हणजे ८० वाघ ताडोबा अंधारी या संरक्षित क्षेत्रात असून, उर्वरित ८० वाघ बाहेर आहेत. इथे प्रजनन क्षमता असलेल्या ६३ वाघिणी आहेत. साधारण दोन ते तीन वर्षांनंतर वाघीण बछड्यांना जन्म देते. या गणितानुसार २०१८ नंतर जिल्ह्यात किमान ६० ते ७० वाघांची संख्या वाढू शकेल. म्हणजे सध्या या जिल्ह्यात २२० ते २३० वाघ असू शकतात.

हे वाघ सुरक्षित आहेत का?ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ सुरक्षित आहेतच. मात्र, अर्धे वाघ या प्रकल्पाबाहेर आहेत. इथे शेती, गावे व जंगल असल्याने या परिसरात वाघ आणि माणसाचा संपर्क येतो. अशा स्थितीत नवे क्षेत्र शोधून वाघ इतर ठिकाणी स्वत: स्थलांतरित होतात. ताडोबाच्या दोन्ही बाजूंनी तसे झालेदेखील आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी परिसरात आधी सहसा वाघ दिसत नव्हता. आता तिथे वाघांचे नियमित दर्शन होऊ लागले आहे. मात्र, संरक्षित क्षेत्राबाहेर वाढलेल्या वाघांमुळे माणसांचा होणारा मृत्यू हा प्रश्न गंभीर होत चालला आहे.2018च्या व्याघ्रगणनेनुसार राज्यात ३१२ पैकी १७५वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. दोन वर्षांत यात ५० वाघांची भर पडली आहे. देशभरात संरक्षित क्षेत्राच्या बाहेर १००० वाघ आहेत. ११० एकट्या चंद्रपूरात आहेत. 56% वाघ हाच राज्यातील एकमेव जिल्हा सांभाळतो आहे.  6.09 वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रती चौरस कि.मी. क्षेत्रात आढळतात. मेळघाटात हेच प्रमाण अवघे १.४९ आहे.

टॅग्स :Tigerवाघ