शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

विश्व महिला संमेलनाच्या विरोधाला जुमानू नका - नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 23:46 IST

संयुक्त राष्ट्र संघाच्या ६२ व्या अधिवेशनाला १२ मार्च रोजी सुरूवात झाली. भारतातील सुमारे ४० प्रतिनिधी  व जगातील सरकारी व सामाजिक स्तरावरील ८००० प्रतिनिधींनी या कृतीसत्रात भाग घेतला आहे.

मुंबई - संयुक्त राष्ट्र संघाच्या ६२ व्या अधिवेशनाला १२ मार्च रोजी सुरूवात झाली. भारतातील सुमारे ४० प्रतिनिधी  व जगातील सरकारी व सामाजिक स्तरावरील ८००० प्रतिनिधींनी या कृतीसत्रात भाग घेतला आहे. स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ.डॉ.नीलम गोऱ्हे, डॉ.नंदिनी आझाद, राजस्थानच्या माजी मंत्री ऊषा पुनिया, डॉ. पाम रजपूत, जेहलम जोशी, भारत सरकारने महिला बालविकास विभागाचे संयुक्त सचिव चेतन सांधी, भारतीय दूतावासाच्या पलोमी त्रिपाठी  आदींचा यात सहभाग आहे. ग्रामीण महिलेचे सक्षमीकरण हा या सत्रातील प्रमुख विषय होता.

१५ मार्च १८रोजी  संयुक्त राष्ट्र संघाच्या इमारतीत स्वयंसेवी संस्थांच्या जाहीर सत्रात आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुद्दा उपस्थित केला की, १९९५ च्या चौथ्या विश्व महिला संमेलनात २०१७ मध्ये १५ वर्ष होत आहेत. खरेतर दर दहावर्षांनी याबाबत व्यापक स्वरूपाने पाचवे विश्व महिला संमेलन घेऊन प्रगतीचा आढावा घेणे शक्य का झाले नाही? सुप्त विरोधातून असा विरोध महिलांच्या प्रगतीला वेगळ्या मार्गाने केला जात  आहे. मग २५ वर्षातील वाटचाल पुढे नेण्यास  कशाप्रकारे जागतिक  स्तरावर  सामूहिक कार्यपद्धती हवी आहे ?कोणी किती विरोध केला म्हणून आपण व आपली पिढी स्वत:ची जबाबदारी टाळू शकत नाही हे लक्षात घेऊन  यूएन विमेन व ईतर प्रतिनिधींनी सज्ज ह्वावे असेही आ.नीलम गोर्हे यांनी ठणकावल्यावर सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.युएन विमेनच्या कार्यकारी संचालक युमिसोचे मातले यांनी स्पष्ट केले की, जगात पाचव्या   महिला दशवार्षिक विश्व  संमेलनासाठी  निधी व संयोजनाची जबाबदारी घेण्यास 'अतिथी राष्ट्र' समोर आली नाहीत हे वास्तव आहे ,या अधिवेशनातही हा एक महत्वाचा विषय समोर आहे. दुर्दैवाने बदल चित्रपट व हाँलीवूड  घडवतेय असे वातावरण केले जाते परंतु महिला अधिकारांच्या आंदोलनाची दखल घेणे टाळले जाते. परंतू आपली कोणी ऊपेक्षा केली तरी  त्याचा अर्थ आपल्या  आंदोलनाने काम केले नाही असा ,य़ाचा आपण विश्वास बाळगू या. महिला चेतनेच्या  या चक्राचे काटे आता कोणीही उलटे फिरवू शकणार नाही ,असे य़ुएन विमेनने सांगून २३ मार्चला सर्वसंमत ठरावात सर्व सरकारांकडून  ठोस ऊपाय व कालबद्ध कार्यक्रमाला वचनबद्धता अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. ◆ याखेरीज दि. १३ मार्चला भारत सरकारने प्रतिनिधींच्या सन्मानार्थ चहापान व संवादात्मक बैठक आयोजित केली होतीत्याला १५ महिला संस्था  प्रतिनिधींची भारतीय दूतावसात ऊपस्थित होत्या.या बैठकीत आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुंबई पोलीसांसोबत स्त्री आधार केंद्राने आयोजित केलेले स्त्री पुरूष समानता व अंमलबजावणीबाबत घेतलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. पंचायतराज महिला लोकप्रतिनिधींसाठी प्रत्येक जिल्ह्यात व्यापक व्यासपीठ असावे, अधिकाऱ्यांनी एकदिवस जिल्हापरिषद, मनपा व स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला लोकप्रतिनिधींसाठी अग्रक्रमाने वेळ द्यावा, असे सुचविले ,त्या  कल्पनेचे स्वागत झाले.महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात इतर राज्याप्रमाणेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असेल तरी गुन्हा शाबीत होण्याचे प्रमाण ७/८% यावरून ५०% च्याही पुढे पोचले आहे ही माहिती आ.नीलम गोर्हे यांनी  दिली. यावर भारत सरकारच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्राच्या मध्ये जी १६ कारणे शोधून दोषसिद्धीची होण्यास यारूपे उचलली गेली त्या धर्तीवर भारताच्या इतर राज्यातही कामाची गरज व्यक्त केली.  विधीमंडळातील कामकाज व विशेष अधिकार समितीच्या प्रमुख या नात्याने केलेल्या  कामाबाबत विशेष ऊत्सुकता दिसून आली. भूमी अधिकार आंदोलन व मकाम नेटवर्क,असंघटीत महिला कामगार,याबाबत संस्थाचे लढे यावरही बैठकीत प्रतिनिधींनी सूचना केल्या. यावेळी  अमेरिकेतील  भारतीय दूतावसाच्या  प्रधान सचिव श्रीमती पलोमी  त्रिपाठी देखील उपस्थित होत्या. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेWomenमहिला