शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

दुष्काळासाठी मुहूर्त पाहू नका; काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 02:06 IST

शनिवारी सकाळपासून काँग्रेसतर्फे दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती.

औरंगाबाद : ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त न पाहता संपूर्ण मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये अनुदान द्या, अन्यथा काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शनिवारी सकाळपासून काँग्रेसतर्फे दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कार्यकर्त्यांशी चर्चा झाली व दुष्काळाची माहिती घेण्यात आली.

मराठवाड्यात ७६ पैकी ५६ तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, उडीद ही पिके वाया गेली आहेत. पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे. चाºयाचा प्रश्न गंभीर होणार आहे. शेतीचा व्यवसाय कोलमडणार आहे. रब्बीचा हंगामसुद्धा धोक्यात आला आहे. मराठवाड्यातील तीन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक काढण्यात आलेली आहे. आता या जिल्ह्यांना काहीच सवलती मिळणार नाहीत, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली.‘या’ राज्यांकडे जातो कोळसाकोळशाचे नीट नियोजन केले नसल्याने राज्यात विजेचे भारनियमन करण्याची वेळ आलेली आहे. निवडणुका जाहीर झालेल्या राज्यांमध्ये कोळसा वळविण्यात येत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. लवकरच जल आराखडा जाहीर होईल. त्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी निर्देशित करण्यात आले पाहिजे. या संदर्भात मी शासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस