शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

केवळ कागदी घोडे नाचवू नका!

By admin | Updated: September 24, 2016 04:25 IST

राज्य सरकार योजनांचे केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्षही देत नाही.

मुंबई : राज्य सरकार योजनांचे केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्षही देत नाही. संबंधित योजनांचा लाभ संबंधित गरजूंना मिळत आहे की नाही, हे पाहण्यासाठी सरकारकडे कोणतीच सक्षम यंत्रणा नाही. योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला सरकारला भाग पाडावे लागते. योजनांचा निधी मध्येच कोठे जातो? याचे जर लेखापरिक्षण केलेत तरी यंत्रणा सुरळीत चालतील, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या उदासीनतेवर टीका केली.अपंगांसाठी प्रत्येक प्रशासनाने त्यांच्या अर्थसंकल्पात तीन टक्के तरतूद करावी, अशी अधिसूचना राज्य सरकारने २०११ मध्ये काढली. मात्र या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास अनेक महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा उदासीन आहेत. तसेच ज्या प्रशासनांनी आर्थिक तरतूद केली आहे त्यांचा निधी वापरलाच जात नसल्याने ‘आॅल इंडिया हँडीकॅप’ व ‘राष्ट्रीय अपंग विकास महासंघ’ या संघांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी या याचिकेच्या सुनावणीत मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने आतापर्यंत किती निधी जमा करण्यात आला व किती खर्च करण्यात आला, याची तपशिलवार माहिती राज्य सरकारला देण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत कोणत्या प्रशासनांनी त्यांच्या अर्थसंकल्पात अपंगांसाठी तीन टक्के निधी राखून ठेवला, ते आम्हाला सांगा आणि ज्यांनी ही तरतूद केली नाही, त्यांच्यावर काय कारवाई केलीत? याचीही माहिती आम्हाला द्या. त्याचबरोबर किती अपंगांना या निधीतून मदत मिळाली हे आम्हाला नावासह सांगा, असा आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिला. (प्रतिनिधी)>धोरणाचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचतो का...२०११ चे धोरणात सुधारणा करून येत्या डिसेंबरमध्ये नवीन धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकील जे. डब्ल्यू. मॅट्टोस यांनी उच्च न्यायालयाला दिली. ‘आधीच्या धोरणाची किती पूर्तता करण्यात आली? याची कल्पना नसताना नवे धोरण कसे आखता? सरकारच्या सगळ्याच योजना जनहितार्थ असतात.त्याविषयी अजिबात शंका नाही. पण याची अंमलबजावणी किती होते? हे सरकारकडून तपासण्यात येत नाही या सर्व योजना केवळ कागदोपत्री असतात आणि याचीच आम्हाला काळजी आहे. केवळ निधी देऊन चालणार नाही, तो कसा व किती खर्च करण्यात येतो, याचे लेखापरिक्षण केलेत तर भ्रष्टाचार होणार नाही. हे आम्हाला सांगायची वेळ येऊ नये,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले.