शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

केवळ कागदी घोडे नाचवू नका!

By admin | Updated: September 24, 2016 04:25 IST

राज्य सरकार योजनांचे केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्षही देत नाही.

मुंबई : राज्य सरकार योजनांचे केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्षही देत नाही. संबंधित योजनांचा लाभ संबंधित गरजूंना मिळत आहे की नाही, हे पाहण्यासाठी सरकारकडे कोणतीच सक्षम यंत्रणा नाही. योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला सरकारला भाग पाडावे लागते. योजनांचा निधी मध्येच कोठे जातो? याचे जर लेखापरिक्षण केलेत तरी यंत्रणा सुरळीत चालतील, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या उदासीनतेवर टीका केली.अपंगांसाठी प्रत्येक प्रशासनाने त्यांच्या अर्थसंकल्पात तीन टक्के तरतूद करावी, अशी अधिसूचना राज्य सरकारने २०११ मध्ये काढली. मात्र या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास अनेक महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा उदासीन आहेत. तसेच ज्या प्रशासनांनी आर्थिक तरतूद केली आहे त्यांचा निधी वापरलाच जात नसल्याने ‘आॅल इंडिया हँडीकॅप’ व ‘राष्ट्रीय अपंग विकास महासंघ’ या संघांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी या याचिकेच्या सुनावणीत मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने आतापर्यंत किती निधी जमा करण्यात आला व किती खर्च करण्यात आला, याची तपशिलवार माहिती राज्य सरकारला देण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत कोणत्या प्रशासनांनी त्यांच्या अर्थसंकल्पात अपंगांसाठी तीन टक्के निधी राखून ठेवला, ते आम्हाला सांगा आणि ज्यांनी ही तरतूद केली नाही, त्यांच्यावर काय कारवाई केलीत? याचीही माहिती आम्हाला द्या. त्याचबरोबर किती अपंगांना या निधीतून मदत मिळाली हे आम्हाला नावासह सांगा, असा आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिला. (प्रतिनिधी)>धोरणाचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचतो का...२०११ चे धोरणात सुधारणा करून येत्या डिसेंबरमध्ये नवीन धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकील जे. डब्ल्यू. मॅट्टोस यांनी उच्च न्यायालयाला दिली. ‘आधीच्या धोरणाची किती पूर्तता करण्यात आली? याची कल्पना नसताना नवे धोरण कसे आखता? सरकारच्या सगळ्याच योजना जनहितार्थ असतात.त्याविषयी अजिबात शंका नाही. पण याची अंमलबजावणी किती होते? हे सरकारकडून तपासण्यात येत नाही या सर्व योजना केवळ कागदोपत्री असतात आणि याचीच आम्हाला काळजी आहे. केवळ निधी देऊन चालणार नाही, तो कसा व किती खर्च करण्यात येतो, याचे लेखापरिक्षण केलेत तर भ्रष्टाचार होणार नाही. हे आम्हाला सांगायची वेळ येऊ नये,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले.