शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

केंद्राने साखर आयात करून शेतक-यांचे वाटोळे करू नये - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:15 IST

पुरेशी साखर असताना केंद्र सरकार साडेतीन लाख टन साखर आयात करणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.

कोल्हापूर : पुरेशी साखर असताना केंद्र सरकार साडेतीन लाख टन साखर आयात करणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. यंदा साखरेचे दर स्थिर राहिल्याने आता कोठे साखर कारखाने व शेतक-यांचे बरे चालले असताना त्यात ढवळाढवळ करून शेतक-यांचे वाटोळे करण्याचा उद्योग केंद्राने करू नयेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.शेट्टी म्हणाले, देशातील साखरेचा साठा तसेच दीड महिन्यात नवीन हंगाम सुरू होत असल्याने साखर आयात करण्याची गरज भासत नाही. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन आयातीला विरोध दर्शविणार आहे. ऊस दर नियंत्रण समितीची बुधवारी (दि. १३) बैठक आहे. यामध्ये खासगी व सहकारी साखर कारखान्यांना आपला ताळेबंद सादर करावा लागेल. साखर आयुक्तांनी हिशेब तपासल्यानंतर अंतिम दराबाबत निर्णय होईल. आतापर्यंत ‘एफआरपी’पेक्षा जादा दर मिळालेला नाही; पण या वर्षी साखरेचे दर चांगले राहिल्याने बहुतांश कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा दर द्यावाच लागेल. ऊस दर नियंत्रण समिती ही घटनात्मक असल्याने त्याच्याशी भाजपचा संबंध नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही समिती स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.ते तर शिवसेनेचे अनुभवाचे बोल!भाजपने ‘स्वाभिमानी’ फोडल्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना शेट्टी म्हणाले, शिवसेनेचे अनुभवाचे बोल आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याने मी पळवून नेणाºयांना नाही तर पळून जाणाºयांना दोष देतो.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी