शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

केंद्राने साखर आयात करून शेतक-यांचे वाटोळे करू नये - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:15 IST

पुरेशी साखर असताना केंद्र सरकार साडेतीन लाख टन साखर आयात करणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.

कोल्हापूर : पुरेशी साखर असताना केंद्र सरकार साडेतीन लाख टन साखर आयात करणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. यंदा साखरेचे दर स्थिर राहिल्याने आता कोठे साखर कारखाने व शेतक-यांचे बरे चालले असताना त्यात ढवळाढवळ करून शेतक-यांचे वाटोळे करण्याचा उद्योग केंद्राने करू नयेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.शेट्टी म्हणाले, देशातील साखरेचा साठा तसेच दीड महिन्यात नवीन हंगाम सुरू होत असल्याने साखर आयात करण्याची गरज भासत नाही. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन आयातीला विरोध दर्शविणार आहे. ऊस दर नियंत्रण समितीची बुधवारी (दि. १३) बैठक आहे. यामध्ये खासगी व सहकारी साखर कारखान्यांना आपला ताळेबंद सादर करावा लागेल. साखर आयुक्तांनी हिशेब तपासल्यानंतर अंतिम दराबाबत निर्णय होईल. आतापर्यंत ‘एफआरपी’पेक्षा जादा दर मिळालेला नाही; पण या वर्षी साखरेचे दर चांगले राहिल्याने बहुतांश कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा दर द्यावाच लागेल. ऊस दर नियंत्रण समिती ही घटनात्मक असल्याने त्याच्याशी भाजपचा संबंध नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही समिती स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.ते तर शिवसेनेचे अनुभवाचे बोल!भाजपने ‘स्वाभिमानी’ फोडल्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना शेट्टी म्हणाले, शिवसेनेचे अनुभवाचे बोल आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याने मी पळवून नेणाºयांना नाही तर पळून जाणाºयांना दोष देतो.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी