शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

त्रयस्थ व्यक्तींनी केलेल्या तक्रारींना आता केराची टोपली, ‘उच्चशिक्षण’ने काढला आदेश; निवेदन देऊन होणारी लूट थांबणार

By विश्वास पाटील | Updated: February 25, 2025 18:05 IST

विश्वास पाटील कोल्हापूर : शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात, त्रयस्थ व्यक्तींनी केलेल्या तक्रारी, अर्ज किंवा निवेदनाची अथवा त्यापुढे जाऊन दिलेल्या धमकीचा ...

विश्वास पाटीलकोल्हापूर : शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात, त्रयस्थ व्यक्तींनी केलेल्या तक्रारी, अर्ज किंवा निवेदनाची अथवा त्यापुढे जाऊन दिलेल्या धमकीचा अजिबात विचार करू नये, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १८ फेब्रुवारीस राज्यातील शिक्षण संचालकांना; तसेच सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत. अनेक लोक, संस्था, संघटना व्यक्तिगत प्रकरणे काढून अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात. त्यातून पैसे मिळवण्याचा धंदा करतात. त्याला या आदेशामुळे चाप बसणार आहे.

राज्य शासन याबाबत असे म्हणते की, त्रयस्थ व्यक्तींकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर काय कार्यवाही करावी, याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे; परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयाने त्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात त्रयस्थ व्यक्तींनी (सामाजिक कार्यकर्ते, संस्थेशी संबंधित नसलेली व्यक्ती किंवा ज्यांच्या व्यक्तिगत कायदेशीर अधिकारांवर गदा आलेली नाही, अशी व्यक्ती) केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या आक्षेपांची नोंद हा शासन आदेश घेतो. हेमराज जगन्नाथ फेदाडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर प्रतिज्ञा चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर, ज्योती बिरादार चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर (५९७३-२०२०), संदीप चुडामण शिंदे विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर (७७४०-२०२१) या खटल्यात न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. शिक्षण विभागाने अनोळखी किंवा त्या प्रकरणाशी संबंध नसलेल्या व्यक्तीकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊ नये. कर्मचाऱ्यांना मुद्दाम त्रास देण्यासाठी अशा तक्रारी केल्या जाऊ शकतात.

तक्रारींचे स्वरूप..कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसाठी असलेल्या शिक्षण सहसंचालक कार्यालयात दरमहा किमान शंभरावर तक्रारी येतात. त्यातील अनेक तक्रारी निनावी असतात. खोटे नाव सांगून, कार्यालयात फोन करून अमुक संस्थेत असा भ्रष्टाचार सुरू आहे, असे सांगणारे फोनही येतात.

मागण्या.. दबाव यातून सुटका होईलव्यापक जनहित असेल तर त्यासाठीची माहिती दिलीच पाहिजे; पण व्यक्तिगत तक्रारी करून ती माहिती द्या म्हणून आंदोलने केली जातात. माहिती नाही दिली तर मग विविध मागण्या पुढे करून दबाव टाकला जातो. अधिकारी त्यास जुमानत नसेल तर मग तो किती वाजता कार्यालयात आला, तिथे लोकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, असे व्हिडीओ करून त्रास दिला जातो. यालाही या आदेशाने चाप बसू शकेल, असे सरकारी अधिकाऱ्यांना वाटते. तक्रार आली की त्याचे उत्तर देण्यासाठी किमान एक पत्र तरी पाठवावेच लागते. त्यातून सुटका होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

राज्यघटनेचा पारदर्शकता हा मूळ गाभा आहे. शिक्षण विभागाचा नवीन आदेश हा त्याला छेद देणारा आहे. माहिती अधिकार कायद्यावरही या आदेशामुळे गदा येईल. -ॲड. बाबा इंदूलकर, कॉमन मॅन संघटना, कोल्हापूर 

आमच्या कार्यालयाकडे आलेल्या सर्वच तक्रारींची दखल आम्ही घेतो; महत्त्वाची परंतु अनावश्यक किंवा ज्यांचा त्या तक्रारीशी अर्थाअर्थी काहीच संबंध नाही, अशा लोकांकडून होणाऱ्या तक्रारी व त्याअन्वये होणारा मनस्ताप टाळण्यासाठी शासनाने हा आदेश काढला आहे. - डॉ. धनराज नाकाडे, सहसंचालक, उच्च व तंत्रशिक्षण, कोल्हापूर विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार