शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कुटुंबनिहाय वाहनांचे सर्वेक्षण केले का? उच्च न्यायालयाने सरकारकडून मागितली माहिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 05:43 IST

शहर व उपनगरात वाहतुकीची समस्या अधिक जटिल होत असल्याने एका घरात अनेक वाहने असणे ही बाब गंभीर आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदविले.

मुंबई : शहर व उपनगरात वाहतुकीची समस्या अधिक जटिल होत असल्याने एका घरात अनेक वाहने असणे ही बाब गंभीर आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदविले. कुटुंबनिहाय किती वाहने आहेत, याची संपूर्ण माहिती आहे का, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याची माहिती राज्य सरकारला १६ फेब्रुवारी रोजी सादर करण्याचे निर्देश दिले.मुंबईतील वाहतूककोंडीबाबत सामाजिक कार्यकर्ते भगवानजी रयानी यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एन.डब्ल्यू. सांब्रे यांच्या खंडपीठापुढे होती.मुंबईत एका घरात अनेक वाहने आहेत. मात्र, पार्किंगसाठी जागा नाही, ही बाब गंभीर आहे. एका घरात किती वाहने आहेत? याचे सर्वेक्षण सरकारने केले आहे का? आम्हाला याची माहिती द्या, असे निर्देश न्यायालयाने परिवहन विभागाला दिले.पार्किंगसाठी जागा आहे का बघाएका वर्षाला सरासरी २० लाख वाहनांची नोंदणी होणे, हे अत्यंत धोकादायक आहे. सरकारने एवढ्या वाहनांची नोंदणी होऊ देऊ नये. वाहनांची नोंदणी करण्यास परवानगी देण्यापूर्वी संबंधितांकडे पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करावी. याची खात्री करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत का, अशीही विचारणा या वेळी न्यायालयाने सरकारकडे केली आहे. याचीही माहिती सरकारला न्यायालयाला द्यावी लागणार आहे.मुंबईत पार्किंगची काय व्यवस्था केली आहे? मुंबईत केवळ बहुमजली पार्किंगचीच सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते. त्यामुळे आणखी किती बहुमजली पार्किंगला परवानगी देणार, तेही आम्हाला सांगा. परदेशातही ही व्यवस्था आहे. तेथील पार्किंगच्या पद्धतीचा अभ्यास करा. मुंबईतील लोक श्रीमंत आहेत, त्यांना बहुमजली पार्किंग पद्धत परवडणारी आहे, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले.ज्यांना वाहने घेणे परवडणारे नाही, त्यांना पदपथावरून चालण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत आहे. ते पदपथावरून वेगाने चालू शकत नाहीत. त्यांच्या अधिकारावर गदा आणू नका, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.त्याशिवाय वाहनांमुळे होणा-या प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या व मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होत आहेत, याचीही माहिती सादर करायचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबई