शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कुटुंबनिहाय वाहनांचे सर्वेक्षण केले का? उच्च न्यायालयाने सरकारकडून मागितली माहिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 05:43 IST

शहर व उपनगरात वाहतुकीची समस्या अधिक जटिल होत असल्याने एका घरात अनेक वाहने असणे ही बाब गंभीर आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदविले.

मुंबई : शहर व उपनगरात वाहतुकीची समस्या अधिक जटिल होत असल्याने एका घरात अनेक वाहने असणे ही बाब गंभीर आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदविले. कुटुंबनिहाय किती वाहने आहेत, याची संपूर्ण माहिती आहे का, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याची माहिती राज्य सरकारला १६ फेब्रुवारी रोजी सादर करण्याचे निर्देश दिले.मुंबईतील वाहतूककोंडीबाबत सामाजिक कार्यकर्ते भगवानजी रयानी यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एन.डब्ल्यू. सांब्रे यांच्या खंडपीठापुढे होती.मुंबईत एका घरात अनेक वाहने आहेत. मात्र, पार्किंगसाठी जागा नाही, ही बाब गंभीर आहे. एका घरात किती वाहने आहेत? याचे सर्वेक्षण सरकारने केले आहे का? आम्हाला याची माहिती द्या, असे निर्देश न्यायालयाने परिवहन विभागाला दिले.पार्किंगसाठी जागा आहे का बघाएका वर्षाला सरासरी २० लाख वाहनांची नोंदणी होणे, हे अत्यंत धोकादायक आहे. सरकारने एवढ्या वाहनांची नोंदणी होऊ देऊ नये. वाहनांची नोंदणी करण्यास परवानगी देण्यापूर्वी संबंधितांकडे पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करावी. याची खात्री करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत का, अशीही विचारणा या वेळी न्यायालयाने सरकारकडे केली आहे. याचीही माहिती सरकारला न्यायालयाला द्यावी लागणार आहे.मुंबईत पार्किंगची काय व्यवस्था केली आहे? मुंबईत केवळ बहुमजली पार्किंगचीच सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते. त्यामुळे आणखी किती बहुमजली पार्किंगला परवानगी देणार, तेही आम्हाला सांगा. परदेशातही ही व्यवस्था आहे. तेथील पार्किंगच्या पद्धतीचा अभ्यास करा. मुंबईतील लोक श्रीमंत आहेत, त्यांना बहुमजली पार्किंग पद्धत परवडणारी आहे, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले.ज्यांना वाहने घेणे परवडणारे नाही, त्यांना पदपथावरून चालण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत आहे. ते पदपथावरून वेगाने चालू शकत नाहीत. त्यांच्या अधिकारावर गदा आणू नका, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.त्याशिवाय वाहनांमुळे होणा-या प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या व मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होत आहेत, याचीही माहिती सादर करायचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबई