शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर भाविकांच्या महापूजा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 14:44 IST

माऊलींची संजीवन समाधी ही चिरंतन राहणे आवश्यक

ठळक मुद्देआजपासून अंमलबजावणी : समाधीचे संवर्धन व जपणुकीसाठी घेतला निर्णय; तज्ज्ञांचा अभिप्राय संजीवन समाधीचा ठेवा चिरंतन जपणे, तसेच संवर्धन करणे जबाबदारी व कर्तव्य

शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ही संजीवन असून, ती समाजाच्या चिरंतन श्रद्धेचा ठेवा आहे. त्यामुळे तिचे संवर्धन व जपणूक होणे हे सर्व भाविकांचे सार्वत्रिक व सामूहिक उत्तरदायित्व आहे. समाधीवरील अभिषेक हा जरी काही मोजक्या भाविकांच्या श्रद्धेचा विषय असला, तरी त्यामुळे समाधीची होणारी झीज, तसेच अभिषेकावेळी मर्यादित लोकांपेक्षा असंख्य भाविकांची संजीवन समाधीचे स्पर्शदर्शनासाठी गैरसोय होत होती. यापार्श्वभूमीवर शुक्रवार (दि.२७) अर्थात पौष शुद्ध प्रतिपदेपासून माऊलींच्या समाधीवर कमिटीच्या वतीने दैनंदिन होणारा पवमान अभिषेकाव्यतिरिक्त भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने घेतला असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त  अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.माऊलींची संजीवन समाधी ही चिरंतन राहणे आवश्यक असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने होणाºया अभिषेकांमुळे समाधीची झीज होत आहे का? याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व त्यांचा अहवाल मागविण्यासाठी संस्थानने भारत सरकारचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीने १७ सप्टेंबर २०१९ रोजी प्रत्यक्ष मंदिरामध्ये येऊन संजीवन समाधीची पाहणी केली होती. समाधीवर होणाऱ्या अभिषेक व महापूजांमुळे समाधीची अधिक झीज होऊ शकते व त्यामुळे समाधीवरील दैनंदिन अभिषेकांची संख्या कमीत कमी राखली जावी, असा अभिप्राय व निष्कर्ष तज्ज्ञांनी १४ नोव्हेंबरला संस्थान कमिटीकडे सादर केला होता.   त्यानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांच्याकडे कमिटीच्या विश्वस्तांनी सर्व विषय कथन केला. या विषयाचे सर्व पैलू जाणून घेतल्यानंतर, जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी संजीवन समधीवरील महापूजा व अभिषेक नियंत्रित करण्याबाबत अनुकूलता दर्शविली. मात्र, भाविकांना अभिषेक व महापूजा करता यावी म्हणून यापुढे माऊलींच्या चलपादुकांवर अभिषेक व महापूजा करण्यास संस्थानने अनुकूलता दर्शविली आहे. त्यासाठी येथील मुक्ताबाई मंडपात पर्यायी व्यवस्था कार्यान्वित केली जाणार असल्याचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड.विकास ढगे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते......समाधीचे संवर्धन करणे महत्त्वाचे संजीवन समाधीचा ठेवा चिरंतन जपणे, तसेच संवर्धन करणे हे प्रत्येक भाविकाची जबाबदारी व कर्तव्य आहे. मात्र, दिवसेंदिवस माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी, तसेच अभिषेक व महापूजा करण्यासाठी भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अभिषेक करतेवेळी विधी, उपचार व त्याचे पावित्र्य याबाबत मोठ्या प्रमाणात तडजोड केली जाते. याबाबत अनेक भाविकांनी संस्थांनकडे प्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. वाढणारे अभिषेक व महापूजा त्याच्याशी संबंधित आर्थिक अनियमिततेचे देखील कारण बनत असल्याचे सह धमार्दाय आयुक्त यांनी नोंदविलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर