शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
2
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
3
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
4
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
5
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
6
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
7
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
8
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
9
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
10
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
11
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
12
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
13
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
14
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
15
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
18
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
19
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
20
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीही ‘ताप’दायक!

By admin | Updated: October 31, 2016 03:43 IST

पालिकेचा आरोग्य विभाग कितीही नाकारत असला, तरी कल्याण-डोंबिवलीकरांसाठी संपूर्ण पावसाळा ‘ताप’दायक ठरला आहे

प्रशांत माने,

कल्याण- पालिकेचा आरोग्य विभाग कितीही नाकारत असला, तरी कल्याण-डोंबिवलीकरांसाठी संपूर्ण पावसाळा ‘ताप’दायक ठरला आहे. गेल्या आठवडाभरात वाढत गेलेल्या थंडीने व्हायरल फिव्हर, फटाक्यांच्या धुराचे प्रदूषण, धुळीचा त्रास आणि प्रदूषणामुळे थंडी-ताप, घसादुखीचे रूग्ण वाढले आहे. ऐन दिवाळीच्या सुट्टीत दवाखान्यांत पेशंटची गर्दी पाहायला मिळते आहे. या दोन्ही शहरांत गेल्या पाच महिन्यात तापाचे तब्बल ३८ हजार ३१० रूग्ण पालिकेलाच आढळले आहेत. या कालावधीत डेंग्यूने थैमान घातले असतानाच मलेरिया, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसीस, टायफॉईड, कॉलरा या आजारांचे रूग्णही मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. विशेष पथकांमार्फत जागोजागी सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगत दोन्ही शहरांमध्ये कोणतीही साथ नसल्याचा दावा आरोग्य विभाग करीत असला तरी आता थंडीच्या मोसमाच्या बदलत्या वातावरणात ‘व्हायरल तापाचा’ने हात-पाय पसरले आहेत. जूनपासूनच मोठया प्रमाणावर तापाचे रूग्ण आढळत होते.त्यावेळी कोणतीही साथ नसल्याचा निर्वाला पालिकेने दिला होता. पावसाळयानंतरही तापाची स्थिती कायम राहिली आहे. जून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांच्या काळात व्हायरल फिव्हरसह डेंग्यूचेही थैमान दोन्ही शहरांत दिसून आले असून यात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. परंतु पालिकेच्या लेखी ते डेंग्यूचे ‘संशयित’ असल्याने त्यांच्या लेखी आजही केवळ दोघांचाच मृत्यू डेंग्युने झाल्याची नोंद आहे. यातील १ मृत रूग्ण केडीएमसीतील, तर दुसरा २७ गावांमधील आहे. >खाद्यपदार्थांच्या गाड्या जैसे थे उघडयावरचे अन्न खाऊ नये असे आवाहन महापालिका करत असली, तरी अशा हातगाड्यांना पालिकेकडूनच अभय दिले जात आहे. कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक, महत्वाचे चौक, उद्याने, कॉलेज परिसरात अशा गाड्या सर्रास पाहायला मिळतात. या कारवाईत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप होतो. ज्या गाड्या राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने चालतात, त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो. घनकचरा व्यवस्थापन विभागाचेही आरोग्य बिघडल्याने शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यातून डास वाढतात आणि डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना पोषक वातावरण तयार होते. शहराच्या ‘ताप’दायक स्थितीला एकप्रकारे आरोग्य विभागही कारणीभूत ठरला आहे. वैद्यकीय आरोग्य विभागाने कल्याण डोंबिवलीतील पाच लाख घरांचा सर्व्हे केला. २० लाख ७६ हजार २०३ नागरिकांची तपासणी केली. यात ३८ हजार ३१० तापाचे रूग्ण आढळून आले. त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले. त्यांना डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टोस्पायरोसीस, टायफॉईड, कॉलराची लागण झाल्याचे समोर आले आहे. खाजगी रूग्णालयांना तापाच्या रूग्णांची माहिती देण्यास सांगण्यात आले असले तरी ते सहकार्य करत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. >पुन्हा वाढले डास...फवारणी अपुरीमलेरियाने एकाचा, तर काविळीने दोघांचा बळी घेतला. परंतु ते ‘संशयित रूग्ण’ असल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे. आताही डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असतानाही फवारणी जवळपास होत नसल्याचे दिसून येते. जूनपासूनचा आढावा घेता मलेरियाचे 422काविळीचे 804टायफॉईडचे 569लेप्टोस्पायरोसीसचे १९, गॅस्ट्रोचे 354कॉलराचे १२ आणि चिकनगुनियाचे पाच रूग्ण आढळून आले. याच काळात डेंग्यूचे 1744संशयित रूग्ण आढळून आले. यातील 1261रूग्ण महापालिका क्षेत्रातील असून 187रूग्ण पालिकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील आहेत. २७ गावांमध्येही रूग्ण पालिकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील आहेत. २७ गावांमध्येही 296डेंग्यूचे रूग्ण आढळले असले, त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात डेंग्यूचेच उपचार सुरू असले तरी पालिकेच्या लेखी ते ‘संशयित’ आहेत.