शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात दिवास्वप्नच

By admin | Updated: May 29, 2016 02:11 IST

मराठवाड्यात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी जायकवाडी, येलदरी, माजलगाव, विष्णुपुरी या प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता बऱ्यापैकी आहे. जायकवाडीतून डाव्या आणि उजव्या कालव्यातून

- विकास राऊत, औरंगाबाद

मराठवाड्यात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी जायकवाडी, येलदरी, माजलगाव, विष्णुपुरी या प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता बऱ्यापैकी आहे. जायकवाडीतून डाव्या आणि उजव्या कालव्यातून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाणी जाते. कालव्यांतून पाणी सोडण्याच्या प्रक्रियेमुळे सिंचनाचा मोठा प्रश्न मिटतो; शिवाय पाण्याची चोरी होत असली तरी ती कमी प्रमाणात होते. कालव्यातून अथवा इतर मार्गातून पाइपलाइन टाकणे हे कितपत तांत्रिक आहे? याचा विचार अद्याप झालेला नाही. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परळीला पाणी दिले जाते. जायकवाडी ते परळी या अंतरात पाइपलाइन टाकली तर तिची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असेल. शिवाय पाइपलाइनच्या निर्वहन क्षमतेचे विशिष्ट वय असते. ते संपल्यानंतर ती जीर्ण होते. औरंगाबाद शहरासाठीची पाइपलाइन जीर्ण झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात किती अडचणी येतात. हे सर्व जण जाणून आहेत. त्यामुळे कालव्यातून पाइपलाइनने पाणीपुरवठा करणे हे कितपत योग्य आहे, यावर अभ्यासक साशंकता व्यक्त करीत आहेत. भूसंपादनाचा मोबदला, पाणीचोरी यातून पुन्हा एक सामाजिक प्रश्न निर्माण होईल. दलालांचे मोठे रॅकेटही त्यातून पुढे येईल. कालव्यांच्या पाण्याची चोरी होते. मग पाइपलाइन जर जागोजागी फोडली तर यंत्रणा कुठे-कुठे ठिगळं लावणार, असा प्रश्न आहे. मोठ्या शहरांना कालव्यांऐवजी पाइपलाइनने पाणी द्यावे. पण सरसकट अशी योजना राबविणे हे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या मराठवाड्याला झेपेल, असे वाटत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. शक्यता पडताळावी!जल अभ्यासक प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना, कालव्यांऐवजी पाइपलाइनने पाणी देणे शक्य असल्याचे मत मांडले. तांत्रिकदृष्ट्या तपासणी केल्यावर त्याचा विचार झाला पाहिजे. विभागामधील अस्तित्वातील प्रकल्प आणि कालव्यांचा विचार करता तेथे हा प्रयोग होणे शक्य वाटत नाही. विद्यमान व्यवस्था ही पाइपलाइनसाठी भौगोलिकदृष्ट्या सक्षम नाही. नवीन प्रकल्पांतून कालवेनिर्मिती करण्याऐवजी थेट पाइपलाइन टाकणे सोईस्कर राहील. विद्यमान प्रकल्पांचे कालव्यांमुळे भौगोलिक वळण बसलेले आहे. त्यामुळे सिंचनाला थोडेफार पाणी मिळते. पाइपलाइनसाठी भूसंपादन करावे लागणार नाही, असे बोलले जात आहे; परंतु भूसंपादन करावेच लागेल. विद्यमान कालव्यांत पाइपलाइन टाकली तर भौगोलिकदृष्ट्या ते समपातळीवर येणार नाही. कालव्यांत पाइपलाइन टाकून ते बुजविणे हे अधिकाऱ्यांना तर केव्हाही आवडेल. कालव्यांसाठी आजवर करण्यात आलेला खर्च कोण देणार, पाइपलाइनसाठी नव्याने खर्च आणि कालव्यांचा खर्च असे दुप्पट नुकसान यातून होणार असल्याचे दिसते.