शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

मराठवाड्यात दिवास्वप्नच

By admin | Updated: May 29, 2016 02:11 IST

मराठवाड्यात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी जायकवाडी, येलदरी, माजलगाव, विष्णुपुरी या प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता बऱ्यापैकी आहे. जायकवाडीतून डाव्या आणि उजव्या कालव्यातून

- विकास राऊत, औरंगाबाद

मराठवाड्यात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी जायकवाडी, येलदरी, माजलगाव, विष्णुपुरी या प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता बऱ्यापैकी आहे. जायकवाडीतून डाव्या आणि उजव्या कालव्यातून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाणी जाते. कालव्यांतून पाणी सोडण्याच्या प्रक्रियेमुळे सिंचनाचा मोठा प्रश्न मिटतो; शिवाय पाण्याची चोरी होत असली तरी ती कमी प्रमाणात होते. कालव्यातून अथवा इतर मार्गातून पाइपलाइन टाकणे हे कितपत तांत्रिक आहे? याचा विचार अद्याप झालेला नाही. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परळीला पाणी दिले जाते. जायकवाडी ते परळी या अंतरात पाइपलाइन टाकली तर तिची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असेल. शिवाय पाइपलाइनच्या निर्वहन क्षमतेचे विशिष्ट वय असते. ते संपल्यानंतर ती जीर्ण होते. औरंगाबाद शहरासाठीची पाइपलाइन जीर्ण झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात किती अडचणी येतात. हे सर्व जण जाणून आहेत. त्यामुळे कालव्यातून पाइपलाइनने पाणीपुरवठा करणे हे कितपत योग्य आहे, यावर अभ्यासक साशंकता व्यक्त करीत आहेत. भूसंपादनाचा मोबदला, पाणीचोरी यातून पुन्हा एक सामाजिक प्रश्न निर्माण होईल. दलालांचे मोठे रॅकेटही त्यातून पुढे येईल. कालव्यांच्या पाण्याची चोरी होते. मग पाइपलाइन जर जागोजागी फोडली तर यंत्रणा कुठे-कुठे ठिगळं लावणार, असा प्रश्न आहे. मोठ्या शहरांना कालव्यांऐवजी पाइपलाइनने पाणी द्यावे. पण सरसकट अशी योजना राबविणे हे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या मराठवाड्याला झेपेल, असे वाटत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. शक्यता पडताळावी!जल अभ्यासक प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना, कालव्यांऐवजी पाइपलाइनने पाणी देणे शक्य असल्याचे मत मांडले. तांत्रिकदृष्ट्या तपासणी केल्यावर त्याचा विचार झाला पाहिजे. विभागामधील अस्तित्वातील प्रकल्प आणि कालव्यांचा विचार करता तेथे हा प्रयोग होणे शक्य वाटत नाही. विद्यमान व्यवस्था ही पाइपलाइनसाठी भौगोलिकदृष्ट्या सक्षम नाही. नवीन प्रकल्पांतून कालवेनिर्मिती करण्याऐवजी थेट पाइपलाइन टाकणे सोईस्कर राहील. विद्यमान प्रकल्पांचे कालव्यांमुळे भौगोलिक वळण बसलेले आहे. त्यामुळे सिंचनाला थोडेफार पाणी मिळते. पाइपलाइनसाठी भूसंपादन करावे लागणार नाही, असे बोलले जात आहे; परंतु भूसंपादन करावेच लागेल. विद्यमान कालव्यांत पाइपलाइन टाकली तर भौगोलिकदृष्ट्या ते समपातळीवर येणार नाही. कालव्यांत पाइपलाइन टाकून ते बुजविणे हे अधिकाऱ्यांना तर केव्हाही आवडेल. कालव्यांसाठी आजवर करण्यात आलेला खर्च कोण देणार, पाइपलाइनसाठी नव्याने खर्च आणि कालव्यांचा खर्च असे दुप्पट नुकसान यातून होणार असल्याचे दिसते.