शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनमध्ये खडाजंगी

By admin | Updated: June 29, 2016 03:11 IST

कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होत नसतील व त्यामुुळे जिल्हयाच्या विकासाला खिळ बसत असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांची गरजच काय?

पालघर : पालघर जिल्हा निर्मितीच्या दोन वर्षानंतरही सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होत नसतील व त्यामुुळे जिल्हयाच्या विकासाला खिळ बसत असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करून आपले पालकमंत्री फक्त आश्वासनावर आश्वासने देत असतील तर पालघरच्या विकासाचे देवच भले करो असे उद्गार बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकुर यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत काढले. व आपल्या सहकाऱ्यांसह सभात्याग केला.पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये दहा तास चालली. यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आनंद ठाकूर, अमीत घोडा, पास्कल धनारे, रामनाथ मोते, रविंद्र पाठक, विलास तरे, शांताराम मोरे, पांडुरंग बरोरा, वसई-विरारच्या महापौर प्रविणा ठाकूर, पालक सचिव मुकेश खुल्लर आयुक्त सतिश लोखंडे, मिलींद गवारे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पोलिस अधिक्षक शारदा राऊत इ. सह विविध विभागचे अधिकारी उपस्थित होते.या वित्त वर्षाच्या ंंंंंंंंंंंंंसर्वसाधारण ११३.९४ कोटी च्या प्रारूप आराखडयाला बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आली.तसेच २०१५-१६ च्या जिल्हावार्षिक योजना (सर्वसाधारण आदिवासी उपायोजना व विशेष घटक योजनांतर्गत मार्च २०१६ अखेरच्या खर्चास यावेळी मान्यताही देण्यात आली) तसेच गत वर्षी झालेल्या विकास कामांचा आढावाही यावेळी देण्यात आला. २०१५-१६ या वर्षात जिल्हावार्षीक योजना सर्वसाधारण ११२.५१ कोटी आदिवासी उपायोजना ४१५.३५ कोटी पैकी ४०५.२४ कोटी तर विशेष घटक योजना १३.९ कोटी पैकी ८.४६ कोटी खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी यावेळी दिली. बैठकीच्या प्रारंभीच मागील सभेचे इतिवृत्त मंजुर करण्यात आले. मात्र त्यावरील अनुपालन अहवालावर बैठकीमध्ये अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. हा विषय तब्बल सहा तास चर्चिला गेला. या दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. डी.एन. रावखंडे व पाटबंधारे विभागाचे जिल्हापातळीवरचे अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आ. हितेंद्र ठाकूरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)>खासदार कपील पाटील यांच्या दांडीची चर्चाठाणे जिल्हयातुन पालघर जिल्हयात येण्यास जिल्हापरिषद कर्मचारी नाखुश असून खासदार कपील पाटील यांनी राजकीय वजन वापरल्याने ठाणे जिल्हयातील कर्मचाऱ्यांना बळ मिळत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये जि.प. कर्मचाऱ्यांच्या प्रश्न चर्चेत आल्यांनतर आपली कोंडी होईल या भीतीने खा. पाटील यांनी दांडी मारल्याची चर्चा होती.आ. हितेंद्र ठाकूरानी सभेमध्ये पालक सचिव मुकेश खुल्लर यांच्या कामकाजाची स्तुती केली. जिल्हाधिकारी बांगर हे देखील एक चांगले व्यक्तीमत्व असून त्यांचा दृष्टीकोनही जिल्हयाच्या विकासाबाबत सकारात्मक असल्याची प्रशंसा सचीव खुल्लर यांनी केली. >पालकमंत्र्यांनीच दिली कबुलीक्रीडा खात्यावर झालेला खर्च, नववीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश, वनविभागामार्फत झालेला खर्च, जिल्हापरिषदेच्या कर्मचााऱ्यांच्या समायोजन , इ. अनेक प्रश्न चर्चेला आले. ंंंंंंंंंंं यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हा नवीन असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ंंंंंंंंं विकास कामावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची कबुली दिली. मात्र जिल्हयात आवश्यक अधिकारी, कर्मचारी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असुन हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यानंतर आ. ठाकुरांनी सभा त्याग करून ते निघून गेले.