शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
4
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
5
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
6
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
7
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
8
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
9
डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
10
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
11
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
12
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
13
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
14
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
15
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
16
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
17
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
18
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
20
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”

जिल्हा रुग्णालयाला हवेत ५० सुरक्षारक्षक

By admin | Updated: April 5, 2017 03:36 IST

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षितेची जबाबदारी अवघ्या तीन सुरक्षारक्षकारक्षकांवर असल्याची बाब येथील नुकत्याच शिकाऊ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर समोर आली

पंकज रोडेकर,ठाणे- गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षितेची जबाबदारी अवघ्या तीन सुरक्षारक्षकारक्षकांवर असल्याची बाब येथील नुकत्याच शिकाऊ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर समोर आली आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, रुग्ण आणि एकंदरीत सर्व गोष्टींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रुग्णालयाला सुरक्षितेसाठी तब्बल ५० सुरक्षारक्षकांची गरज असून त्यादृष्टीने वारंवार आरोग्य विभागाकडे मागणी केल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाही.या रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण भागातून गोरगरिब रु ग्ण उपचार घेण्यासाठी येतात. त्यातच या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी सुरुवातीपासून चार सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या घडीला त्यापैकी तीन सुरक्षारक्षकांवर रुग्णालयाच्या सुरक्षितेची जबाबदारी आहे. त्यांच्यावर रुग्णालयातील लेबर वार्ड, नवजात शीशु कक्ष आणि ट्रामा केअर वार्ड आणि अपघात कक्ष या ठिकाणांची जबाबदारी असते. त्यादृष्टीने ही संख्या फार कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यातच धुळे, मुंबईतील डॉक्टरांवर झालेल्या हल्लयानंतर त्यांनी पुकारलेल्या संपामुळे ठाणे रुग्णालयात ठाणे शहर पोलिसांनी आठ (दिवस-रात्र प्रत्येकी चार) पोलीस तैनात केले होते. याचदरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आलेल्या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी शिकाऊ डॉक्टरवर हल्ला केला. त्यानंतर येथील सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ लागला. या हल्लयानंतर रुग्णालयाती सुरक्षितेच्या दृष्टीने शहर पोलिसांनी आणखी चार पोलीस वाढवून दिल्याने रुग्णालयात हत्यारी १२ पोलीस तैनात आहेत. तर दुसरीकडे रुग्णालयाने प्रशासनाने खाजगी सुरक्षारक्षक मिळावेत अशी मागणी पुन्हा आरोग्य विभागाक डे केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र या मागणीला अजून आरोग्य विभागाने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे वाढीव सुरक्षारक्षकांची मागणी पूर्ण झालेली नाही. (प्रतिनिधी)>रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी सध्या तीन सुरक्षारक्षक आणि १२ पोलीस आहेत. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर रूग्णांच्या नातलगांकडून होणारे वाढते हल्ले लक्षात घेवून रुग्णालयात आणखी ५० सुरक्षारक्षकांची गरज आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. - डॉ. केम्पी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालय.