शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

जिल्हा रुग्णालयाला हवेत ५० सुरक्षारक्षक

By admin | Updated: April 5, 2017 03:36 IST

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षितेची जबाबदारी अवघ्या तीन सुरक्षारक्षकारक्षकांवर असल्याची बाब येथील नुकत्याच शिकाऊ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर समोर आली

पंकज रोडेकर,ठाणे- गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षितेची जबाबदारी अवघ्या तीन सुरक्षारक्षकारक्षकांवर असल्याची बाब येथील नुकत्याच शिकाऊ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर समोर आली आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, रुग्ण आणि एकंदरीत सर्व गोष्टींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रुग्णालयाला सुरक्षितेसाठी तब्बल ५० सुरक्षारक्षकांची गरज असून त्यादृष्टीने वारंवार आरोग्य विभागाकडे मागणी केल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाही.या रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण भागातून गोरगरिब रु ग्ण उपचार घेण्यासाठी येतात. त्यातच या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी सुरुवातीपासून चार सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या घडीला त्यापैकी तीन सुरक्षारक्षकांवर रुग्णालयाच्या सुरक्षितेची जबाबदारी आहे. त्यांच्यावर रुग्णालयातील लेबर वार्ड, नवजात शीशु कक्ष आणि ट्रामा केअर वार्ड आणि अपघात कक्ष या ठिकाणांची जबाबदारी असते. त्यादृष्टीने ही संख्या फार कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यातच धुळे, मुंबईतील डॉक्टरांवर झालेल्या हल्लयानंतर त्यांनी पुकारलेल्या संपामुळे ठाणे रुग्णालयात ठाणे शहर पोलिसांनी आठ (दिवस-रात्र प्रत्येकी चार) पोलीस तैनात केले होते. याचदरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आलेल्या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी शिकाऊ डॉक्टरवर हल्ला केला. त्यानंतर येथील सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ लागला. या हल्लयानंतर रुग्णालयाती सुरक्षितेच्या दृष्टीने शहर पोलिसांनी आणखी चार पोलीस वाढवून दिल्याने रुग्णालयात हत्यारी १२ पोलीस तैनात आहेत. तर दुसरीकडे रुग्णालयाने प्रशासनाने खाजगी सुरक्षारक्षक मिळावेत अशी मागणी पुन्हा आरोग्य विभागाक डे केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र या मागणीला अजून आरोग्य विभागाने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे वाढीव सुरक्षारक्षकांची मागणी पूर्ण झालेली नाही. (प्रतिनिधी)>रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी सध्या तीन सुरक्षारक्षक आणि १२ पोलीस आहेत. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर रूग्णांच्या नातलगांकडून होणारे वाढते हल्ले लक्षात घेवून रुग्णालयात आणखी ५० सुरक्षारक्षकांची गरज आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. - डॉ. केम्पी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालय.