शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ST Strike: कारवाईचा बडगा उगाराल तर असंतोषाचा भडका उडेल; राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 08:46 IST

महामंडळाचे राज्य शासनातील विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकारकडून अद्याप ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्ती किंवा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी, कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.

महामंडळाचे राज्य शासनातील विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकारकडून अद्याप ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अशात आंदोलनकारी आणि संपातील कामगारांवर कारवाईची भूमिका सरकारने घेतली आहे. दबावतंत्राचा वापर करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

सर्वोत्तम सेवा  n एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना मनसेचा पाठिंबा जाहीर करतानाच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्याची गरज राज ठाकरे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. काेरोनाकाळात एसटी कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम सेवा दिली. n विलंबाने मिळणारे वेतन, त्यामुळे होत असलेल्या आत्महत्या, महामंडळाचा गैरकारभार यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांत असंतोषाचा भडका उडाला आहे. अशा परिस्थितीत  कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. एसटी कर्मचारी, कामगार जगला तरच एसटी जगेल, हे भान बाळगण्याची गरज आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे