शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष

By admin | Updated: August 4, 2016 02:16 IST

महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बुधवारीही दिवसभर नेरूळ ते वाशी दरम्यान चक्का जाम झाला होता.

नवी मुंबई : महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बुधवारीही दिवसभर नेरूळ ते वाशी दरम्यान चक्का जाम झाला होता. सानपाडा रेल्वे स्टेशन व अन्नपूर्णा चौक ते महामार्गादरम्यानही वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास एक महिन्यापासून वाहतूकदार व नागरिक त्रस्त असताना सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर मौन बाळगले आहे. सायन - पनवेल महामार्गावरील खड्ड्यांनी नवी मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने १२२० कोटी रूपये खर्च करून महामार्गाचे रूंदीकरण केले. परंतु वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढलीच आहे. वाशी, सानपाडा, तुर्भे, जुईनगर, नेरूळ ते पनवेलपर्यंत महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. सकाळी व सायंकाळी वाहनांची संख्या वाढली की पूर्ण वाहतूकच ठप्प होत आहे. बुधवारी दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सानपाडावरून नेरूळला जाण्यासाठी एक तास वेळ लागत होता. बसने प्रवास करणाऱ्या अनेकांनी बसमधून उतरून जवळच्या रेल्वेस्टेशनपर्यंत पायी जाणे पसंत केले. तुर्भे गावामधील भाजपा कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत केली. महामार्गावरील कोंडीमुळे अनेकांनी सानपाडा भुयारी मार्गातून पामबीच रोडवर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु अंतर्गत रोडवरही वाहतूक कोंडी असल्याने रेल्वे स्टेशनसमोरही चक्काजाम झाला होता. सानपाडा पेट्रोलपंप ते एपीएमसीपर्यंतच्या रोडवरील वाहतूकही थांबली होती. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. महामार्गावर एक महिन्यापासून वाहतूक कोंडी होत आहे. वारंवार मागणी करूनही ठेकेदार खड्डे बुजवत नाही. रोज सकाळी कामावर जाताना व कामावरून येताना एक ते दोन तास वाहतूक कोंडीमध्ये जात आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचेही प्रचंड नुकसान होत आहे. रोज दोन ते तीन मोटारसायकल घसरून अपघात होत आहे. परंतु या समस्येकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. शहरातील छोट्याशा समस्यांवरही आंदोलन करणारे राजकीय पक्ष वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गप्प बसले आहेत. यापूर्वी शिवसेनेने महामार्गाच्या कामाविषयी जनहित याचिका दाखल केली होती. परंतु आता राज्यातील सत्तेमध्ये सहभागी असताना व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याची जबाबदारी आहे. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू असल्याने व राज्यातील सत्ता असल्यामुळे तेही गप्प बसले आहेत. राष्ट्रवादी काँगे्रसची नवी मुंबईमध्ये सत्ता आहे. परंतु राज्यात विरोधी पक्षात असल्याचा विसर त्यांना पडला असल्याची टीका शहरवासी करत आहेत. काँगे्रसही या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. ।शिवसेनेला पडला महामार्गाचा विसर सायन - पनवेल महामार्गाचे रूंदीकरण सुरू असताना सर्वाधिक आंदोलने शिवसेनेने केली होती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. परंतु गत दोन वर्षापासून अचानक शिवसेनेने या प्रश्नावर मौन बाळगले आहे. महामार्ग रूंदीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. एक वर्षामध्ये रोडवर खड्डे पडले आहेत. पादचारी व भुयारी मार्गांचे कामही थांबले आहे. एक महिन्यापासून नवी मुंबईमधील प्रवाशांसह महामार्गावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रोज चक्का जाम होत असताना शिवसेना गप्प का, असा प्रश्नही आता शहरवासी विचारू लागले असून या समस्येवर अद्याप आंदोलन का नाही अशीही विचारणा होत आहे.