शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

राज्य सरकार बरखास्त करा

By admin | Updated: November 30, 2014 01:41 IST

भारतीय जनता पार्टीकडे बहुमत नाही. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी त्यांनी घटनेची पायमल्ली केली.

नागपूर : भारतीय जनता पार्टीकडे बहुमत नाही. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी त्यांनी घटनेची पायमल्ली केली. पुन्हा बहुमत सिद्ध करीत नाही तोर्पयत राज्य सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी येथे केली. 
काँग्रेसतर्फे शेतक:यांच्या मागण्यांसाठी 8 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असून, याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणो, माजी कें द्रीय मंत्री मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार करणार आहेत. तत्पूर्वी 1 व 2 डिसेंबरला राज्यभरात तहसील व जिल्हा कार्यालयांवर मोर्चे, 4 डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली़ 
या मोर्चाच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे माहेश्वरी भवन येथे आयोजित विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. 
ठाकरे म्हणाले, राज्यात यंदाचा दुष्काळ 1972पेक्षाही गंभीर आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने सरकारने त्यांना आर्थिक पॅकेज द्यावे. पीक बुडाल्याने सोयाबीन व धान उत्पादक शेतका:यांना हेक्टरी 25 हजार तर कापसाला प्रति क्विंटल 6 हजार रुपये भाव ठरवून द्यावा. बाजारभावातील रक्कम सरकारने बोनस म्हणून जाहीर करावी. ऊस उत्पादकांना भाव जाहीर करावा, फळबागांना हेक्टरी 5क् हजारांची मदत देण्याची मागणी केली. 
मागील 3 वर्षात राज्य सरकारने शेतक:यांना 4  हजार कोटींची आर्थिक मदत दिली. परंतु भाजपा नेतृत्वातील सरकार शेतक:यांच्या प्रश्नावर उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला़ 
तसेच अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. बैठकीत राजेंद्र मुळक, नितीन राऊ त, विकास ठाकरे, अमर काळे, नामदेव उसेंडी आदींनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
 
वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव मांडावा
आजवर विदर्भावर अन्यायच झाला. निवडणुकीत याचा काँग्रेसला फटका बसला. काँग्रेसने अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आणावा, असे मत नितीन राऊ त यांनी मांडले. केंद्र व राज्यातील सरकारचा कारभार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंडय़ानुसार चालत असल्याची टीका त्यांनी केली.
आमदारांचे निलंबन घटनाबाह्य
विधानसभेत भाजपाचे बहुमत नाही. त्यांची बहुमत सिद्ध करण्याची पद्धती नियमबाह्य आहे. कोणतेही गैरकृ त्य केले नसताना करण्यात आलेले काँग्रेस आमदारांचे निलंबन घटनाबाह्य आहे. त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अशी मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली.