शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane : दिशा सालियनची बलात्कार करून हत्या; नारायण राणे यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 12:59 IST

केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत गंभीर आणि काही खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी, दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे...

मुंबई - सध्या राज्यातील भाजप-शिवसेना संघर्ष चांगलाच पेटल्याचे दिसत आहे. दोन्हीही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे आणि आरोपप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्य, राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा आखाडा बनले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे बार झडत आहेत. असे असतानाच केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेत गंभीर आणि काही खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी, दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे.

दिशा आत्महत्या का करेल? -दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली, पण आत्महत्या झाल्याचे दाखवण्यात आले. दिशा आत्महत्या का करेल? असे म्हणत राणे यांनी, दिशा सालियानचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट का आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची तेथील रजिस्टरची पानं का फाडली गेली? असे प्रश्न उपस्थित केले. एवढेच नाही तर, जेव्हा सुशातंसिंह राजपूतला हे प्रकरण समजले, तेव्हा मी यांना सोडणार नाही, असे सुशात म्हणाला होता. यानंतर, त्याच्या घरात बाचाबाची झाली. त्यातून सुशांतसिंह राजपूत याचीही हत्या झाली, असा दावाही नारायण राणे यांनी यावेळी केला. 

मर्डर केस कुणालाही पचवता येत नाही -सुशांतच्या हत्येचा दावा करतानाही, सुशांतच्या सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब झाले? ठराविक माणसाची रुग्णवाहिका कशी आली? रुग्णालयात कसे नेले गेले, पुरावे कुणी नष्ट केले? असे सवाल खडे करत, या सर्वांची चौकशी होणार, असा इशाराही राणे यांनी दिला आहे. याच वेळी त्यांनी रमेश मोरेची हत्या कुणी केली आणि का केली? असा प्रश्नही उपस्थित केला. तसेच, मर्डर केस कुणालाही पचवता येत नाही आणि ती कधीच क्लोज होत नाही, असेही राणे म्हणाले.

...दुसरा कुणी असता तर राजीनामा दिला असता -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना राणे म्हणाले, मला राजकारण शिकवू नये. कुणाच्या आजारपणावर बोलणार नाही, पण दुसरा कुणी असता तर राजीनामा दिला असता. यावर, ते थांबले नाही, तर शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे असेल तर लोककल्याणकारी कामे करा. मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, कॅबिनेटमध्ये जात नाहीत, सभागृहात जात नाहीत. कोरोनात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त दीड लाख लोक येथे मेले आणि हे म्हणतात आमचं कतृत्व. एवढे मेले त्याचे काही वाटत नाही, असेही राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत