शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

राजकारण सोडा, दुष्काळावर चर्चा करा ; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 02:36 IST

दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर तरी राजकारण करू नका. राज्याच्या हिताचा विचार असेल तर विधिमंडळात चर्चा करा. कोणत्याही चर्चेस उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिले.

मुंबई : दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर तरी राजकारण करू नका. राज्याच्या हिताचा विचार असेल तर विधिमंडळात चर्चा करा. कोणत्याही चर्चेस उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिले.मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने ३१ आॅक्टोबरला १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आणखी काही हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. आघाडी सरकारसारखे टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करून आम्ही थांबलो नाही. आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाईल व आदेशांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे ७५०० कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याचा प्रस्ताव राज्याने पाठविला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.राज्यातील ५० लाख शेतकºयांना आतापर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यांची नावांनिशी यादी आमच्याकडे तयार आहे. बोंडअळीग्रस्त ३५ लाख शेतकºयांना २ हजार २८५ कोटी रुपयांची मदत थेट बँक खात्यात देण्यात आली आहे. यापूर्वी इतकी मदत कधीही देण्यात आलेली नव्हती, असे ते म्हणाले.शहरी नक्षलवाद्यांबाबतच्या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, त्या विषयी पुराव्यासह पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आता निर्णय न्यायालय देईल. पत्र परिषदेला भाजपा-शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस