शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

खड्ड्यांमुळे रस्ते जलमय

By admin | Updated: August 4, 2016 01:17 IST

पावसामुळे रहाटणी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रहाटणी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रहाटणी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रस्त्यांवर खड्ड्यात पाणी साचल्याने अपघात होत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामाचा निकृष्ट दर्जा उघड झाला आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.रहाटणी चौकात बस थांबा आहे. या ठिकाणाहून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात जाण्यासाठी बस टर्मिनल आहे. मात्र इथेच पाणी साचत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जवळच पालिकेची प्राथमिक शाळा आहे. अनेक विद्यार्थी येथूनच बसने ये-जा करतात. मात्र रस्त्यावर पाणी आणि चिखल झाल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.रामनगर ते नखातेवस्ती चौकापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. गोडांबे कॉर्नर चौकात तर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरील पावसाचे पाणी जाण्याची कोणताही मार्ग नसल्याने, तसेच रहाटणी फाटा ते रहाटणी चौकापर्यंत रस्त्याला योग्य प्रकारे उतार न दिल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे. रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत. याच ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला होता. तो पालिका प्रशासनाने बुजविला. मात्र त्याची योग्य प्रकारे दखल घेतली न गेल्याने याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडला आहे. यात एखादा मोठा अपघात होऊ शकतो. अशीच परिस्थिती नखाते चौक व लिंक रस्त्यावरील जय भवानी चौकाची आहे. या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले; मात्र योग्य प्रकारे सपाटीकरण करण्यात न आल्याने रस्त्याच्या मध्यभागी पाणी साचून राहत आहे. पिंपळे सौदागरला भयावत परिस्थिती पिंपळे सौदागर अगदी काही वर्षांच्या कालावधीत विकसित झाला असला, तरी पालिका प्रशासन विकासाच्या बाबतीत फोल ठरले आहे. या परिसरातील एकाही रस्त्याचे योग्य प्रकारे सपाटीकरण करण्यात आले नसल्याने भूमिगत स्टॉर्म वॉटर लाइन टाकल्या असल्या, तरी पाणी रस्त्यावरच थांबून राहत आहे. त्यामुळे रहाटणी-जगताप डेअरी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे. यातून पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा कामातील हलगर्जीपणा दिसून येत आहे. महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संबंधित रस्त्यांची पाहणी करून अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)>निकृष्ट दर्जाची कामेपावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेकडून या भागात अनेक ठिकाणी रस्त्याच्या डागडुजीची कामे केली असल्याचा महापालिका प्रशासनाने दावा केला होता. मात्र, महिन्याभरातच या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महापालिकेने केलेल्या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. त्यामुळे सदर कामाची पाहणी कोणत्या अधिकाऱ्याने केली आणि ठेकेदारांना बिले कोणी देऊ केली असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी होत आहे.>खड्ड्यांमुळे अपघातपिंपळे सौदागर भागात रस्त्यांचे सपाटीकरण योग्य प्रकारे केले नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचत आहे. यातून मार्ग काढत वाहनचालकांना जावे लागते. साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असतात. तसेच विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना या रस्त्यावरून पायी प्रवास करताना वाहनांमुळे उडणारे पाणी अंगावर झेलत जावे लागते. यामुळे अनेकवेळा वादावादीचे प्रसंगही घडले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा अशी मागणी होत आहे.