शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

गडकिल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांना थेट तुरुंगवासाची शिक्षा; विधेयक विधानसभेत सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:08 IST

गडकिल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणी जाऊन वास्तूंचे नुकसान करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कायदा करण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक सादर करण्यात आले.  

गडकिल्ले आणि प्राचीन ठिकाणी जाऊन मद्यपान केल्याच्या, वास्तूंचे नुकसान केल्याचे प्रकार राज्यात घडत असून, याला पायबंद घालण्यासाठी महायुती सरकारने आता कायदा केला जाणार आहे. यासंदर्भातील सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सादर केले.  

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तू शास्त्र विषयक स्थळे विशेष सुधारणा विधेयक विधानसभेत सादर केले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, "खूप महत्त्वाचं विधेयक हे आहे. गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर दारू पिणं, तिथल्या इमारतींचे नुकसान करणे, याला आतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची काहीही तरतूद नव्हती. आता एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा अशा प्रकारचे दहशत निर्माण होईल, अशा प्रकारची तरतूद असलेलं हे विधेयक आहे." 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली होती. नंतर याचा मसुदा तयार करण्यात आला. यापूर्वी २०२० मध्ये सरकारने असा गुन्हा करणाऱ्यांना १ वर्ष कारावास आणि दहा रुपये दंडांची शिक्षा करण्याची तरतूद केली होती. 

राज्यात अनेकदा किल्ल्यांवर दारू, ड्रग्स सेवन करून धिंगाणा घातल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. अशा प्रकार रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची मागणी विधानसभेत वारंवार केली गेली होती. त्यानंतर आता सरकारने शिक्षेचा कालावधी आणि दंडांच्या रकमेत वाढ केली आहे.