शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

राज्यातील शांतता क्षेत्रे ठरविली का? - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 02:03 IST

सुधारित ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० नुसार, राज्यातील ‘शांतता क्षेत्र’ अधिसूचित केली का, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केला. ध्वनिप्रदूषणाच्या सुधारित नियमांमुळे यापूर्वीची राज्यातील सर्व ‘शांतता क्षेत्र’ रद्द केली आहेत.

मुंबई : सुधारित ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० नुसार, राज्यातील ‘शांतता क्षेत्र’ अधिसूचित केली का, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केला. ध्वनिप्रदूषणाच्या सुधारित नियमांमुळे यापूर्वीची राज्यातील सर्व ‘शांतता क्षेत्र’ रद्द केली आहेत.आगामी सणोत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यात यावे, यासाठी राज्यातील सर्व महापालिका व नगरपरिषदांना नोटिसीवर ठेवण्यासंदर्भात आदेश देऊ, असे न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.केंद्र सरकारने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांत दुरुस्ती करून, ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला. जोपर्यंत एखादे क्षेत्र ‘शांतता क्षेत्र’ म्हणून राज्य सरकार घोषित करत नाही, तोपर्यंत त्या क्षेत्राची गणना ‘शांतता क्षेत्रा’त केली जाणार नाही, असे नव्या नियमांत म्हटले आहे.नवे नियम विचारात घेतल्यास, उच्च न्यायालयाने यापूर्वी शाळा, रुग्णालये, महाविद्यालये, न्यायालयाने यांचा समावेश ‘शांतता क्षेत्रा’त केला होता. मात्र, या नव्या नियमांमुळे उच्च न्यायालयाच्या या आदेशाचे पालन केले जाऊ शकत नाही, असे राज्य सरकारने गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये न्यायालयाला सांगितले.नव्या नियमानुसार ‘शांतता क्षेत्र’ अधिसूचित करण्यात येतील, अशी हमीही गेल्या वर्षी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली होती. ‘राज्य सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही, असे दिसते. राज्यात कोणते ‘शांतता क्षेत्र’ आहेत, ते आम्हाला माहीत हवे. सणोत्सवाच्या काळात या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. राज्य सरकारने आगामी सणांची नावे आणि त्यांच्या तारखांची यादी आमच्यासमोर सादर करावी. जर कोणत्याही प्रशासनाने नियमांचे पालन केले नाही, तर त्यावर अवमानाची कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा न्यायालयाने दिला.सुनावणी ७ आॅगस्टलासणांच्या काळात ध्वनिप्रदूषणांच्या नियमांना धाब्यावर बसविण्यात येते. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने या सर्व याचिकांवरील सुनावणी ७ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र