शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शांतता क्षेत्रे ठरविली का? - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 02:03 IST

सुधारित ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० नुसार, राज्यातील ‘शांतता क्षेत्र’ अधिसूचित केली का, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केला. ध्वनिप्रदूषणाच्या सुधारित नियमांमुळे यापूर्वीची राज्यातील सर्व ‘शांतता क्षेत्र’ रद्द केली आहेत.

मुंबई : सुधारित ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० नुसार, राज्यातील ‘शांतता क्षेत्र’ अधिसूचित केली का, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केला. ध्वनिप्रदूषणाच्या सुधारित नियमांमुळे यापूर्वीची राज्यातील सर्व ‘शांतता क्षेत्र’ रद्द केली आहेत.आगामी सणोत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यात यावे, यासाठी राज्यातील सर्व महापालिका व नगरपरिषदांना नोटिसीवर ठेवण्यासंदर्भात आदेश देऊ, असे न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.केंद्र सरकारने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांत दुरुस्ती करून, ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला. जोपर्यंत एखादे क्षेत्र ‘शांतता क्षेत्र’ म्हणून राज्य सरकार घोषित करत नाही, तोपर्यंत त्या क्षेत्राची गणना ‘शांतता क्षेत्रा’त केली जाणार नाही, असे नव्या नियमांत म्हटले आहे.नवे नियम विचारात घेतल्यास, उच्च न्यायालयाने यापूर्वी शाळा, रुग्णालये, महाविद्यालये, न्यायालयाने यांचा समावेश ‘शांतता क्षेत्रा’त केला होता. मात्र, या नव्या नियमांमुळे उच्च न्यायालयाच्या या आदेशाचे पालन केले जाऊ शकत नाही, असे राज्य सरकारने गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये न्यायालयाला सांगितले.नव्या नियमानुसार ‘शांतता क्षेत्र’ अधिसूचित करण्यात येतील, अशी हमीही गेल्या वर्षी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली होती. ‘राज्य सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही, असे दिसते. राज्यात कोणते ‘शांतता क्षेत्र’ आहेत, ते आम्हाला माहीत हवे. सणोत्सवाच्या काळात या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. राज्य सरकारने आगामी सणांची नावे आणि त्यांच्या तारखांची यादी आमच्यासमोर सादर करावी. जर कोणत्याही प्रशासनाने नियमांचे पालन केले नाही, तर त्यावर अवमानाची कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा न्यायालयाने दिला.सुनावणी ७ आॅगस्टलासणांच्या काळात ध्वनिप्रदूषणांच्या नियमांना धाब्यावर बसविण्यात येते. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने या सर्व याचिकांवरील सुनावणी ७ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र