शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...
2
तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे
3
'या' ६ सरकारी स्कीम्समध्ये मिळतो लाखोंचा लाभ, प्रीमिअम ₹१०० पेक्षाही कमी; गरीब असो वा श्रीमंत सर्वच घेऊ शकतात फायदा
4
हॅलो, इसको भेज, उसको भेज...! पाकिस्तानने युपीआयपेक्षा फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली; बोलताच पैसे ट्रान्सफर होणार
5
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
6
१० जानेवारी: गुरु-आदित्य योग: तुमच्या आयुष्यातील अडचणी निवारणासाठी उत्तम योग; करा 'हा' उपाय 
7
व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करू शकते रिलायन्स इंडस्ट्रीज; का आणि कशी बदलली परिस्थिती?
8
क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..
9
Stock Market Today: सततच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला; Vodafone-Idea मध्ये ५% ची तेजी
10
"सगळ्या योजना आखल्या पण याची कधी अपेक्षाच केली नाही"; ठाकरे बंधुंच्या युतीवर राज ठाकरेंचा पलटवार
11
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
12
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
13
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
14
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
15
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
17
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
18
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
19
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
20
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या सूचक इशाऱ्यानंतर शिवसेना नरमली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 14:32 IST

शिवसेना-भाजपा युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला भाजपच्या कोट्यातील 162 मधील जागा देणार येणार आहेत. मात्र या मित्रपक्षांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी दबाव टाकला जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेली नुरा कुस्ती अखेर संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेने भाजपचा 126-162 असा फॉर्म्युला मान्य केल्याचे सुत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून दिलेल्या सूचक इशाऱ्यानंतर शिवसेनेने नरमईची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं असताना गुरुवारी रात्री उशिरा भाजपा-शिवसेनेची मॅरेथॉन बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात ही बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा 162 जागा तर उर्वरित 126 जागा शिवसेना लढवणार असल्याचं निश्चित झालं असल्याची सूत्रांची माहिती आहे.  

शिवसेना-भाजपा युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला भाजपच्या कोट्यातील 162 मधील जागा देणार येणार आहेत. मात्र या मित्रपक्षांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी दबाव टाकला जाणार असल्याची माहिती आहे. जागावाटपाबाबत आणि युतीची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे समजते.

तत्पूर्वी मंत्री दिवाकर रावते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना 'फिफ्टी-फिफ्टी'च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपनेते गिरीश महाजन यांनी जागा वाटपाचा निर्णय अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच निश्चित करणार असून कोण काय म्हणतं याला महत्त्व नसल्याचे सांगत राऊत आणि खासदार यांना टोला लागवला होता. त्यामुळे युती तुटणार की, राहणार यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरवारी महाराष्ट्रात होते. त्यावेळी त्यांनी भाजपला स्पष्ट बहुमत देण्याची मागणी करून शिवसेनेला एकप्रकारे इशाराच दिला होता. तसेच राममंदिराच्या मुद्दावरून शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या पुनरोच्चाराचा देखील मोदींनी समाचार घेतला होता. तसेच राममंदिराच्या मुद्दावर वायफळ बडबड करू नका अशी विनंती करत न्यायालयावर विश्वास ठेवा असंही सुनावले. मोदींच्या या इशाऱ्यानंतरच जागा वाटपावरून शिवसेनेने एक पाऊल मागे घेतले का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.