शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

पंतप्रधान मोदींच्या सूचक इशाऱ्यानंतर शिवसेना नरमली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 14:32 IST

शिवसेना-भाजपा युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला भाजपच्या कोट्यातील 162 मधील जागा देणार येणार आहेत. मात्र या मित्रपक्षांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी दबाव टाकला जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेली नुरा कुस्ती अखेर संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेने भाजपचा 126-162 असा फॉर्म्युला मान्य केल्याचे सुत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून दिलेल्या सूचक इशाऱ्यानंतर शिवसेनेने नरमईची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं असताना गुरुवारी रात्री उशिरा भाजपा-शिवसेनेची मॅरेथॉन बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात ही बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा 162 जागा तर उर्वरित 126 जागा शिवसेना लढवणार असल्याचं निश्चित झालं असल्याची सूत्रांची माहिती आहे.  

शिवसेना-भाजपा युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला भाजपच्या कोट्यातील 162 मधील जागा देणार येणार आहेत. मात्र या मित्रपक्षांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी दबाव टाकला जाणार असल्याची माहिती आहे. जागावाटपाबाबत आणि युतीची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे समजते.

तत्पूर्वी मंत्री दिवाकर रावते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना 'फिफ्टी-फिफ्टी'च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपनेते गिरीश महाजन यांनी जागा वाटपाचा निर्णय अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच निश्चित करणार असून कोण काय म्हणतं याला महत्त्व नसल्याचे सांगत राऊत आणि खासदार यांना टोला लागवला होता. त्यामुळे युती तुटणार की, राहणार यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरवारी महाराष्ट्रात होते. त्यावेळी त्यांनी भाजपला स्पष्ट बहुमत देण्याची मागणी करून शिवसेनेला एकप्रकारे इशाराच दिला होता. तसेच राममंदिराच्या मुद्दावरून शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या पुनरोच्चाराचा देखील मोदींनी समाचार घेतला होता. तसेच राममंदिराच्या मुद्दावर वायफळ बडबड करू नका अशी विनंती करत न्यायालयावर विश्वास ठेवा असंही सुनावले. मोदींच्या या इशाऱ्यानंतरच जागा वाटपावरून शिवसेनेने एक पाऊल मागे घेतले का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.