शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्याचे धीरज देशमुखांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 15:20 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि भिसे हे आजी-माजी आमदार निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच मतदारसंघात मोठ्याप्रमाणात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून यावेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख सुद्धा काँग्रेस पक्षाकडून रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच मोठे आव्हान असणार असल्याचे बोलले जात आहे. कारण विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे व माजी आमदार वैजनाथ शिंदे हे सुद्धा काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्याचे धीरज देशमुखांसमोर आव्हान असणार आहे.

लातूर ग्रामीण मतदारसंघ २००९ च्या पुनर्रचनेत तयार झाला आहे. लातूर जिल्ह्यात १९८० पासून देशमुख कुटंबाचे वर्चस्व राहिलं आहे. २००९ मध्ये पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत लातूर ग्रामीणमधून वैजनाथ शिंदे यांनी या मतदारसंघाचे पहिले आमदार बनण्याचा मान मिळवला. पुढे २०१४ मध्ये मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. तर त्यांच्या जागी विद्यमान आमदार असलेले त्र्यंबक भिसे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली व त्यांचा विजय सुद्धा झाला.

आता पुन्हा आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि भिसे हे आजी-माजी आमदार निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहे. मात्र धीरज देशमुख सुद्धा याच मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे धीरज त्यांनी यासाठीच याच भागातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला शिंदे वर भिसे यांचे आव्हान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी कुणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मांजरा नदीच्या पट्यात उस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मांजरा,विकास,रेणा साखर कारखान्यांच्या ग्रामीण भागावर प्रभाव आहे. त्यामुळे येथील आर्थिक हितसंबंध देशमुख परिवाराच्या राजकरणाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे धीरज यांना याचा फायदा होऊ शकतो. मात्र पक्षातील इच्छुकांची नाराजी करून मिळवलेली उमेदवारी त्यांना धोक्याची ठरू शकते. त्यामुळे उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्यात धीरज देशमुख किती यशस्वी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.