शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्याचे धीरज देशमुखांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 15:20 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि भिसे हे आजी-माजी आमदार निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच मतदारसंघात मोठ्याप्रमाणात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून यावेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख सुद्धा काँग्रेस पक्षाकडून रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच मोठे आव्हान असणार असल्याचे बोलले जात आहे. कारण विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे व माजी आमदार वैजनाथ शिंदे हे सुद्धा काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्याचे धीरज देशमुखांसमोर आव्हान असणार आहे.

लातूर ग्रामीण मतदारसंघ २००९ च्या पुनर्रचनेत तयार झाला आहे. लातूर जिल्ह्यात १९८० पासून देशमुख कुटंबाचे वर्चस्व राहिलं आहे. २००९ मध्ये पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत लातूर ग्रामीणमधून वैजनाथ शिंदे यांनी या मतदारसंघाचे पहिले आमदार बनण्याचा मान मिळवला. पुढे २०१४ मध्ये मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. तर त्यांच्या जागी विद्यमान आमदार असलेले त्र्यंबक भिसे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली व त्यांचा विजय सुद्धा झाला.

आता पुन्हा आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि भिसे हे आजी-माजी आमदार निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहे. मात्र धीरज देशमुख सुद्धा याच मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे धीरज त्यांनी यासाठीच याच भागातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला शिंदे वर भिसे यांचे आव्हान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी कुणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मांजरा नदीच्या पट्यात उस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मांजरा,विकास,रेणा साखर कारखान्यांच्या ग्रामीण भागावर प्रभाव आहे. त्यामुळे येथील आर्थिक हितसंबंध देशमुख परिवाराच्या राजकरणाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे धीरज यांना याचा फायदा होऊ शकतो. मात्र पक्षातील इच्छुकांची नाराजी करून मिळवलेली उमेदवारी त्यांना धोक्याची ठरू शकते. त्यामुळे उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्यात धीरज देशमुख किती यशस्वी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.