शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

"धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, त्याचाही राग माझ्यावर होता" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 08:52 IST

कामाख्या देवीने महाविकास आघाडीचा बळी दिला. देवीलाही ते आवडलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेलाही आवडलं नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

मुंबई - धर्मवीर आनंद दिघे सिनेमा काढला. तुम्हाला आवडला पण काही लोकांना पचला नाही. त्याचाही राग होता. कुणाला आवडो न आवडो मी पर्वा करत नाही. धर्मवीर आनंद दिघेंसाहेबांनी बाळासाहेंबांना गुरू मानलं. आज आम्ही बाळासाहेबांचे, धर्मवीरांचे विचार घेऊन पुढे चाललोय. आम्ही हा निर्णय का घेतला त्याचं आत्मपरिक्षण करण्यापेक्षा गद्दार, बंडखोर म्हटलं जातं. हा बंड नव्हे, उठाव आहे, क्रांती आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही घेतलेला निर्णय हा शिवसेनेला, शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आहे. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केला आहे. जेव्हापासून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून शेकडो लोकं पाठिंबा द्यायला येतायेत. आम्ही रक्ताचं पाणी करून, जिवाचं रान करून, कष्ट घेऊन शिवसेना वाढवली. जे बोलतात त्यांच्या अंगावर किती केसेस आहेत? आम्ही जेल भोगलीय. १०० हून अधिक केसेस अंगावर घेतल्यात. धर्मवीर आनंद दिघेंनी ठाणे, पालघर जिल्ह्यात इतिहास घडवला. दिघेंनी उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवलं. योग्यवेळी सगळं काही सांगेन असा त्यांनी सांगितले.  

त्याचसोबत कामाख्या देवीने महाविकास आघाडीचा बळी दिला. देवीलाही ते आवडलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नाही. कामाख्या देवीच्या मंदिरात गेलो होतो. आम्ही सगळे एका रांगेत होतो. तेव्हा रांगेतील एक मुलगी म्हणाली काय डोंगर, काय झाडी. शहाजीबापू इतके प्रसिद्ध झालेत. अत्यंत खेळीमेळीचे वातावरण गुवाहाटीत होते. शहाजीबापूंच्या कलागुणांना वाव मिळाला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी चांगला पाहुणचार केला. १५ दिवसांच्या त्या अनुभवावर सिनेमा निघू शकतो. आमच्याकडे चर्चा करायला माणसं पाठवली, इकडे पुतळे जाळत होते, पदावरून हटवत होते. दगडफेक करायला सांगितलं पण एकनाथ शिंदेंच्या घरावर दगडफेक करायला पुढे कोण येणार? एकनाथ शिंदे यांनी मधमाशासारखी माणसं जोडली आहेत. ती सोडली तर पळताभुई थोडी होईल असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 

पांडुरंगाची पूजा करण्याचं भाग्य मिळालंमी दिल्लीहून पुण्यात उतरलो, पंढरपूरला चाललो होतो तेव्हा रस्त्याच्या शेजारी दुतर्फा स्वागतासाठी लोकं जमली होती. आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मला मिळाला हे भाग्याचं आहे. आपण जी विकासाची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका घेतली त्याला लोकांनी साथ दिली. पंढरपूर देवस्थान तिरूपती बालाजीसारखं झाल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरचा विकास आराखडा बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत अशीही माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना