शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, त्याचाही राग माझ्यावर होता" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 08:52 IST

कामाख्या देवीने महाविकास आघाडीचा बळी दिला. देवीलाही ते आवडलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेलाही आवडलं नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

मुंबई - धर्मवीर आनंद दिघे सिनेमा काढला. तुम्हाला आवडला पण काही लोकांना पचला नाही. त्याचाही राग होता. कुणाला आवडो न आवडो मी पर्वा करत नाही. धर्मवीर आनंद दिघेंसाहेबांनी बाळासाहेंबांना गुरू मानलं. आज आम्ही बाळासाहेबांचे, धर्मवीरांचे विचार घेऊन पुढे चाललोय. आम्ही हा निर्णय का घेतला त्याचं आत्मपरिक्षण करण्यापेक्षा गद्दार, बंडखोर म्हटलं जातं. हा बंड नव्हे, उठाव आहे, क्रांती आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही घेतलेला निर्णय हा शिवसेनेला, शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आहे. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केला आहे. जेव्हापासून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून शेकडो लोकं पाठिंबा द्यायला येतायेत. आम्ही रक्ताचं पाणी करून, जिवाचं रान करून, कष्ट घेऊन शिवसेना वाढवली. जे बोलतात त्यांच्या अंगावर किती केसेस आहेत? आम्ही जेल भोगलीय. १०० हून अधिक केसेस अंगावर घेतल्यात. धर्मवीर आनंद दिघेंनी ठाणे, पालघर जिल्ह्यात इतिहास घडवला. दिघेंनी उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवलं. योग्यवेळी सगळं काही सांगेन असा त्यांनी सांगितले.  

त्याचसोबत कामाख्या देवीने महाविकास आघाडीचा बळी दिला. देवीलाही ते आवडलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नाही. कामाख्या देवीच्या मंदिरात गेलो होतो. आम्ही सगळे एका रांगेत होतो. तेव्हा रांगेतील एक मुलगी म्हणाली काय डोंगर, काय झाडी. शहाजीबापू इतके प्रसिद्ध झालेत. अत्यंत खेळीमेळीचे वातावरण गुवाहाटीत होते. शहाजीबापूंच्या कलागुणांना वाव मिळाला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी चांगला पाहुणचार केला. १५ दिवसांच्या त्या अनुभवावर सिनेमा निघू शकतो. आमच्याकडे चर्चा करायला माणसं पाठवली, इकडे पुतळे जाळत होते, पदावरून हटवत होते. दगडफेक करायला सांगितलं पण एकनाथ शिंदेंच्या घरावर दगडफेक करायला पुढे कोण येणार? एकनाथ शिंदे यांनी मधमाशासारखी माणसं जोडली आहेत. ती सोडली तर पळताभुई थोडी होईल असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 

पांडुरंगाची पूजा करण्याचं भाग्य मिळालंमी दिल्लीहून पुण्यात उतरलो, पंढरपूरला चाललो होतो तेव्हा रस्त्याच्या शेजारी दुतर्फा स्वागतासाठी लोकं जमली होती. आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मला मिळाला हे भाग्याचं आहे. आपण जी विकासाची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका घेतली त्याला लोकांनी साथ दिली. पंढरपूर देवस्थान तिरूपती बालाजीसारखं झाल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरचा विकास आराखडा बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत अशीही माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना