शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 12:56 IST

Gopichand padalkar Dhangar reservation : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांसाठी जास्त कटकटीचा ठरणार, असे स्थिती सध्या राज्यात दिसत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिसत असताना त्यात आता धनगर विरुद्ध आदिवासी या वादाने डोकं वर काढले आहे.

Gopichand Padalkar Mahayuti : धनगर समुदायातून येणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये उपोषण सुरू असतानाच आमदार गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्रभर रास्ता रोको करण्याची हाक दिली आहे. सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप पडळकरांनी केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाज आक्रमक झाल्याने त्यांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर उभे राहिले आहे. 

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, "सरकारवर भरोसा आहे. भरोसा नसण्याचे कारण नाही. आम्ही सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करतोय. पण, सरकारला चुकीची माहिती देण्याचे किंवा त्यांच्यावर दबाव टाकण्याचे काही प्रयत्न महाराष्ट्रातून होत असतील, तर धनगर समाज गप्प बसणार नाही", असा आरोप पडळकरांनी केला.  

गोपीचंद पडळकरांचे आदिवासी समाजाला आवाहन काय?

"आज आदिवासी जमातीतील लोकांना आम्ही हात जोडून विनंती करतोय की, सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने निर्णय दिलाय, जातीचे उपवर्गीकर करा आणि त्यात तुमचे ए करा. जे आदिवासी आहेत. ज्यांना आदिवासी आरक्षणाचा लाभ मिळतो, त्यांना ए करा आणि धनगरांना बी करा. तुमचे सात टक्क्याचे आरक्षण सुरक्षित राहू द्या", असे पडळकर म्हणाले. 

"तुमचे राजकीय प्रतिनिधीत्व, तुमचे शिक्षणातील, तुमचे नोकरीतील आणि तुमच्यासाठी जे बजेट येते; ते स्वतंत्र राहील. तुमच्या लोकसंख्येप्रमाणे येईल. आमच्या लोकसंख्येप्रमाणे आमचे आता जे ३.५० टक्के आरक्षण आहे. तेवढेच द्या. जेव्हा केव्हा जनगणना होईल, त्यामध्ये धनगरांची संख्या पोटजातींसह मोजल्यानंतर त्यांची आकडेवारी निश्चित होईल. त्या आरक्षणाचा विषय वेगळा राहील", अशी भूमिका पडळकरांनी आंदोलनाची हाक देताना मांडली.  

राज्यभर रास्ता रोको करण्याची हाक

"महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे की, तुम्ही ताकदीने सोमवारी (२३ सप्टेंबर)... राज्य सरकारला आपलीही ताकद दाखवण्याची गरज आहे. तु्म्ही सोमवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करा", असे आवाहन पडळकर यांनी राज्यातील धनगर समुदायाला केले आहे. 

विधानसभेला आरक्षणाचा मुद्दा कळीचा

मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेली मागणी पूर्ण करणे, सरकारसमोर सगळ्यात मोठी अडचण बनली आहे. कायद्याच्या चौकटीत सगेसोयरेची मागणी पूर्ण अशक्य आहे, असे सरकारकडून सातत्याने सांगितले जात आहे. पण, मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. 

दुसरीकडे ओबीसी समाजाचा जरांगेंच्या मागणीला कडाडून विरोध होत आहे. या संघर्षाचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये बसला. आता धनगर विरुद्ध आदिवासी असा मुद्दा समोर आला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करण्यास आदिवासी समाजाचा विरोध आहे. आदिवासी समुदायातून येणारे आमदारही याविरोधात आक्रमक आहेत. 

अनेक विधानसभा मतदारसंघात धनगर समाज आणि आदिवासी मतदारांची भूमिका निर्णयाक आहे. त्यामुळे या दोन्ही समुदायांची नाराजी दूर करण्याचे आव्हान सत्ताधारी म्हणून महायुतीसमोर असणार आहे.