शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यावरील संकट आजचं नाही तर गेले ५३ दिवस...; धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:37 IST

माझा राजीनामा घेऊन एखाद्या समाजाला टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा हेतू असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आमदार सुरेश धस यांना लगावला. 

बीड - माझ्यावर आलेले संकट आजचं नाही, गेल्या ५३ दिवसांपासून मला टार्गेट करण्यात येतंय. त्यात भगवान गड आपल्या पाठीशी उभा राहतो त्यामुळे निश्चित आपली मोठी जबाबदारी वाढली आहे असं सांगत धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री महाराजांनी केलेल्या विधानावर भाष्य केले. 

पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, भगवान गड माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे. यासारखी ताकद आणि न्यायाचार्यांचा इतका मोठा विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. भगवान गड गरीबातल्या गरीब माणसाच्या पैशातून उभा राहिला. हा भगवान गड माझ्या पाठीशी संकटात उभा आहे. ही माझ्यासाठी शक्ती आहे. या शक्तीचे वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही. सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याची फार मोठी जबाबदारी टाकली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावर दर्शनासाठी आलो नव्हतो, काल रात्री इथं आलो, दर्शन घेतले आहे. आता दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहे. अनेक वर्षानंतर भगवान गडावर मुक्कामाला आलो. आज ५३ दिवस झाले, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया मला टार्गेट करून मिडिया ट्रायल चालवलं जातंय. यात कधीही मी अवाक्षर बोललो नाही. आज मुंबईकडे जाताना भगवान गडावर मुक्काम करून पुढे जायचं हे ठरवलं. भगवान बाबांचे दर्शन झाल्यानंतर शक्ती, प्रेरणा घेऊन सर्वसामान्यांसाठी लढण्याची ताकद मिळते असं धनंजय मुंडेंनी सांगितले. 

दरम्यान, न्यायाचार्य बाबांसोबत मी कधीही राजकीय चर्चा केली नाही. जी काही चर्चा होते ती अध्यात्मावर होती. ज्ञानेश्वरीतील अनेक अनुभव सांगतात ते ऐकल्यानंतर त्यातून आपल्याला काहीतरी मिळते. स्वत:चे आणि लाखो लोकांचे जीवन चांगले बनण्यासाठी उपयुक्त ठरते. जे काही प्रकरण घडलंय, ५३ दिवस झालेत. संतोष देशमुख यांची जी काही हत्या झाली, त्या हत्येतील आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे. यात जे कुणी दोषी असतील कुणालाही सोडू नये. शासन झाले पाहिजे ही पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. काही जण राजकारण करत असतील ते माझा राजीनामा घेण्यासाठी आहे की संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्यासाठी आहे. माझा राजीनामा घेऊन एखाद्या समाजाला टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा हेतू असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आमदार सुरेश धस यांना लगावला. 

संकटातून बाहेर येण्याचा आत्मविश्वास

संत भगवान बाबाचा मी भक्त आहे. नामदेव शास्त्रीबाबांचा भक्त आहे. या ठिकाणी कायम श्रद्धा असते. याचं दर्शन घेतल्यानंतर काम करण्याची ऊर्जा मिळते. असा गड आपल्या पाठीशी उभा राहतो. त्यातून एक आत्मविश्वास मिळतो. हा आत्मविश्वास घेऊन या संकटातून बाहेर निघून मायबाप जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणे याच्या पलीकडे काहीच नाही असंही धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSuresh Dhasसुरेश धस