शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

Dhananjay Munde: 'राज्यपालांना महापुरुष नकोय, राष्ट्रगीतही नकोय'; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 14:27 IST

Dhananjay Munde: 'देशात आतापर्यंतच्या कुठल्याही राज्यपालाने असे कृत्य केले नसेल.'

मुंबईः आजपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने तीव्र निषेध व्यक्त केला. राज्यपालांनी आपले अभिभाषण अर्ध्यावर सोडले आणि नंतर राष्ट्रगीतालाही उपस्थित राहिले नाही, यामुळे अनेक नेत्यांनी त्यांच्या कृत्यावर आक्षेप घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj)यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल राज्यपालांचा धिक्कार असो, अशा घोषणाही सरकारतर्फे देण्यात आल्या.

धनंजय मुंडेंचे टीकास्त्रराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधिमंडळात अभिभाषण पूर्ण केलं नाही, हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली. राज्यपालांचे अभिभाषण हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सगळ्यात मोठा गाभा असतो. महाराष्ट्राला राज्यपालांच्या अभिभाषणातून सरकारची दिशा लक्षात येते. राज्यपालांनी अभिभाषण न करता ते पटलावर ठेवलं, भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. अभिभाषण न करता राज्यपालांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला. याची सुरुवात भाजपच्या सदस्यांनी केली, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

महापुरुष-राष्ट्रगीत नकोयमुंडे पुढे म्हणाले की, या राज्यपाल महोदयांना महाराष्ट्राची जनता माहीत नाही. महाराष्ट्राची संसदीय कामकाज आणि नियम माहीत नाहीत. त्यांना महाराष्ट्राचे महापुरुष नकोयत. त्यांना अर्थसंकल्पात त्यांचं भाषण नकोय. एवढंच नाही तर त्यांना देशाचे राष्ट्रगीतही नकोय. हे असं कृत्य आजपर्यंत देशाच्या संसदीय कामात कुठल्याही राज्यपाल महोदयाकडून झालेलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यपालांनी घेतला काढता पायअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल अभिभाषण करत असताना सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. यावेळी आपले अभिभाषण अर्ध्यावरच सोडून राज्यपालांनी तेथून काढता पाय घेतला. राज्यपालांनी भाषण अर्धवट केलं आणि त्यानंतर होणाऱ्या राष्ट्रगीतालीही ते थांबले नाहीत. यावरुनही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन