शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

भक्तांपुढे सूर्याचा दाहही फिका!

By admin | Updated: April 17, 2016 01:46 IST

‘पंढरपुरातील तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस ओलांडून जात असतांनाही चैत्री वारीनिमित्त आलेल्या विठ्ठलभक्तांनी आठ तास रांगेत उभे राहून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले

- दीपक होमकर,  पंढरपूर‘पंढरपुरातील तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस ओलांडून जात असतांनाही चैत्री वारीनिमित्त आलेल्या विठ्ठलभक्तांनी आठ तास रांगेत उभे राहून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले आणि सूर्यनारायणाच्या दाहच्या तीव्रतेपेक्षा निस्सीम भक्ती अधिक खोल असल्याचे दाखवून दिले. शुक्रवारी ४३़७ तर शनिवारी ४३़२ अंश सेल्सियस असे तापमान वैष्णवांना विठ्ठल दर्शनापासून रोखू शकले नाही़चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूरच्या यात्रेला अधिक महत्त्व असते़ त्यामुळे त्या यात्रेला जाता-जाता पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी अनेक दिंड्या व कावड्या पंढरपूर मार्गे जातात़ त्यामुळे या चैत्रीवारीला धावती वारी असेही म्हणतात. दुष्काळाचा दाह आणि विक्रमाकडे वाटचाल करणारे तापमान यामुळे यंदाची वारी दरवर्षीपेक्षा निम्मीच होईल, असा अंदाज पंढरपूरकरांचा होता; मात्र विठ्ठलावर जीवापाड भक्ती करणाऱ्या वारकरी भक्तांनी हा अंदाज फोल ठरवला. या धावत्या वारीच्या निमित्तानेही पंढरीत सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले. पहाटेपासूनच अनेक दिंड्या आणि कावडी पंढरपुरात दाखल व्हायला सुरुवात झाली. सकाळी नऊनंतर उन्हाची तीव्रता कमालीची वाढत असल्याने नऊच्या आत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी पहाटेपासूनच चंद्रभागेत पवित्र स्नान करून दर्शनबारीत उभे राहिले़ त्यामुळे पहाटे दर्शन सुरु होण्याआधीच दर्शनबारी वीणेगल्लीपर्यंत पोहोचली होती तर सकाळी नऊ वाजता ती सारडा भवनच्या पुढे होती. नऊनंतर मात्र दर्शनबारी वाढली नाही, ती ओसरत वीणेगल्लीपर्यंत आली़ त्यानंतर सायंकाळी ऊन उतरल्यावर पुन्हा गर्दी वाढली आणि दर्शनबारी पुन्हा वाढली आणि ती रांग पत्राशेडच्या जवळपास पोहोचली होती. त्यामुळे दर्शनासाठी सुमारे सात ते आठ तासांचा वेळ लागत होता़ (प्रतिनिधी)व्हीआयपी दर्शन; कडेकोट बंदव्हीआयपी आणि आॅनलाईन दर्शन पास दशमी, एकादशी व द्वादशी या तीन दिवसांत बंद ठेवण्यात आले होते. शिवाय बारीत होणारी घुसखोरीही कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे जवळपास बंद होती़ त्यामुळे भाविकांना सात ते आठ तासांत दर्शन होणे सुकर झाले अन्यथा व्हीआयपी पास सुरु असल्यास दर्शनाला दहा तासांहून अधिक वेळ लागतो.राज्यात सतत वाढत चाललेल्या तापमानामुळे यंदाची वारी दरवर्षीपेक्षा निम्मीच होईल, असा अंदाज पंढरपूरकरांचा होता; मात्र विठ्ठलावर जीवापाड भक्ती करणाऱ्या वारकरी भक्तांनी हा अंदाज फोल ठरवला.