शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भाजपात आल्यावर चौकशी होत नाही? या आरोपावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 17:07 IST

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आला आहे.

मुंबई : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आलाय. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील 9 प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणेच्या गैरवापराबाबत आरोप लावले आहेत. या पत्रात विरोधकांनी सीबीआय, ईडीसारख्या संस्थाचा दुरुपयोग होत असल्याचं सांगत भाजपावर थेट निशाणा साधला आहे. यावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपची सत्ता आली. तेव्हापासून अनेक विरोधी नेत्यांवर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील काही नेत्यांना अटक झाली, तर काहींवरील चौकशी अद्याप सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या नेत्यांनी या काळात भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांच्याविरोधातील तपासाची गती मंदावली आहे किंवा त्या नेत्यांची प्रकरणातून सुटका झाली आहे. याचीच तक्रार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणतात की, 'देशात यंत्रणांचा गैरवापर कुठेही झालेला नाही. जो गैरमार्गाने पैसे कमावतो, फक्त त्यांच्यावरच कारवाई होत आहे. यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. अशाप्रकारचे पत्र लिहून कुणाचीही सुटका होणार नाही. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने पैसा कमावणे बंद करा.'

'भाजपमध्ये आल्यामुळे कुणाचीही कारवाई बंद झालेली नाही. असे असेल तर विरोधकांनी एखादे उदाहरण द्यावे. कारवाई चुकीची झाली असेल तर न्यायालय आहेच, तिथे न्याय मिळेल. विरोधी पक्षातून भाजपमध्ये कोणी प्रवेश केला तर त्यांची चौकशी बंद होते, असे नाही. कुणाचीही चौकशी बंद झाली नाही,' असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी