शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

भाजपात आल्यावर चौकशी होत नाही? या आरोपावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 17:07 IST

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आला आहे.

मुंबई : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आलाय. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील 9 प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणेच्या गैरवापराबाबत आरोप लावले आहेत. या पत्रात विरोधकांनी सीबीआय, ईडीसारख्या संस्थाचा दुरुपयोग होत असल्याचं सांगत भाजपावर थेट निशाणा साधला आहे. यावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपची सत्ता आली. तेव्हापासून अनेक विरोधी नेत्यांवर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील काही नेत्यांना अटक झाली, तर काहींवरील चौकशी अद्याप सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या नेत्यांनी या काळात भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांच्याविरोधातील तपासाची गती मंदावली आहे किंवा त्या नेत्यांची प्रकरणातून सुटका झाली आहे. याचीच तक्रार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणतात की, 'देशात यंत्रणांचा गैरवापर कुठेही झालेला नाही. जो गैरमार्गाने पैसे कमावतो, फक्त त्यांच्यावरच कारवाई होत आहे. यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. अशाप्रकारचे पत्र लिहून कुणाचीही सुटका होणार नाही. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने पैसा कमावणे बंद करा.'

'भाजपमध्ये आल्यामुळे कुणाचीही कारवाई बंद झालेली नाही. असे असेल तर विरोधकांनी एखादे उदाहरण द्यावे. कारवाई चुकीची झाली असेल तर न्यायालय आहेच, तिथे न्याय मिळेल. विरोधी पक्षातून भाजपमध्ये कोणी प्रवेश केला तर त्यांची चौकशी बंद होते, असे नाही. कुणाचीही चौकशी बंद झाली नाही,' असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी