शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Devendra Fadnavis vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषयच संपवला! पवार-ठाकरेंना चांगलंच सुनावलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 18:56 IST

राज्यपालांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटलं

Devendra Fadnavis vs Sharad Pawar: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला होता. यावरुन महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या मुद्द्यावर आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. सकाळी उदयनराजे छत्रपतींनी आपले मत मांडले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. तर संध्याकाळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. याच मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला आणि पवार-ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर सडेतोड भाष्य केले.

उदयनराजे छत्रपती यांनी भूमिका मांडल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीशी वाटली, असा एका वाक्यात फडणवीसांनी विषय संपवला. "राज्यपालांच्या विधानाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. उदयनराजे महाराज यांनी जाणीव करून दिली, तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलले. सर्वात आधी उदयनराजे छत्रपतींनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. आणि शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली की उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीच लागते. या साऱ्या गोष्टींना राजकीय रंग कसा देता येईल असा प्रयत्न सुरू आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे दैवत आहेत. भारताचा ते आदर्श आहेत. यावर वाद किंवा दुमत असूनच शकत नाही. पण आज जे लोक खडबडून जागे झाले त्याचे कारण उदयनराजे यांनी लिहिलेले पत्र आहे. त्यांनी पत्र लिहिले आणि पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शरद पवार यांनी पत्रकारांशी या विषयावर संवाद साधला आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली म्हणून उद्धव ठाकरे या विषयावर बोलले," असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले