शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

"त्यांना शिव्या देऊ नका, त्यांचे आभार माना, त्यांच्यामुळेच हे सरकार येऊ शकलं"; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सणसणीत टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 19:21 IST

"नऊ वाजता बोलणारे आता जरा कमी झालेत"

Devendra Fadnavis Trolls Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ( Shiv Sena ) पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. सुरूवातीला राज्यसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ( BJP ) महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. ५०पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ घेऊन त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापना केली. संजय राऊत गेली अडीच वर्षे सातत्याने भाजपावर आणि आता शिंदे गटावर टीका करत आहेत. या मुद्द्यावरून आज देवेंद्र फडणवीसांनीसंजय राऊतांना जोरदार टोला लगावला.

"नऊ वाजता बोलणारे अलिकडच्या काळात कमी बोलायला लागले आहेत. कारण काय ते आम्हाला माहिती नाही पण त्यांचं बोलणं कमी झालं आहे. तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका. उलट त्यांचे आभार माना. कारण हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा कोणाचाच नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी वैताग आणला, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी वैताग आणला. सगळेच त्यांना वैतागले. शेवटी सगळ्यांनी ठरवलं की हा लाऊडस्पीकर बंद करायचा असेल तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांना खरं तर आपण धन्यवादच दिले पाहिजेत", अशी सडेतोड बॅटिंग देवेंद्र फडणवीसांनी केली.

भाजपाने शब्द दिला नव्हता, शिवसेनेने गद्दारी केली!

"शिवसेनेने 2019 मध्ये भाजपाशी गद्दारी केली. मी साक्षीदार आहे की आम्ही कोणताही शब्द दिला नव्हता. पंतप्रधान मोदीजी, अमित शाह, उद्धव ठाकरे सारेच सांगत होते की फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवसेना राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. निवडणूक निकालाच्या आधीच, आमचे मार्ग खुले, असं ते सांगू लागले. मी फोन केले पण त्यांनी फोन घेतले नाहीत. कारण त्यांचं आधीच ठरलं होतं", असा थेट आरोप फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केला.

आता जनता खुला श्वास घेतेय!

" महाविकास आघाडीच्या लोकांनी अनेक कार्यकर्त्यांवर केसेस केल्या. पण कोणी घाबरलं नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्ष फक्त सूड उगवण्याचे काम केले. आमच्या विरोधात बोललात तर घर तोडू, खूप ठिकाणी पोलिस स्थानकात फिरवू, असा त्यांचा कार्यक्रम होता. अन्याय, अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली. पण आपण सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे अखेर आता खुला श्वास घेत बैठक होतेय आणि महाराष्ट्राची जनता खुला श्वास घेतेय", असेही फडणवीसांनी स्पष्ट केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे