शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

शिवसेनेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, बिहारमध्येही भाजप पुन्हा येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 19:16 IST

सुशील मोदी यांच्या सुरात सूर मिळवत, बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीवर मोठे भाष्य केले आहे. सुशील मोदी यांच्या सुरात सूर मिळवत, बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ठाण्यात लोकमतच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी, सुशील मोदी यांच्याच सुरात सूर मिळवत फडणवीस म्हणाले, ते अगदी बरोबर बोलले आहेत. बिहारमध्ये आमचे (भाजप) 75 लोक निवडून आले आणि आरजेडीचे 42 लोक निवडून आले. तरीही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे बाजप कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रात निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली, असेही फडणवीस म्हणाले.

शरद पवारांवर भाष्य करता फडणवीस म्हणाले, शरद पवारांनी पक्ष बदलले, तेव्हा पक्षांतर बंदी कायदा नव्हता. आता आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत. शरद पवारांचे दुःख वेगळे आहे आणि ते आपल्या सर्वांना माहीत आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

नितीश कुमार वेळीच सावध झाले -निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आता भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. परंतु नितीश कुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असे सांगत शरद पवार यांनी महागठबंधन करण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBiharबिहारthaneठाणेBJPभाजपा