शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Devendra Fadnavis BJP Shiv Sena Alliance: "हे भाजपाचे 'हिंदूसैनिक' आणि बाळासाहेब ठाकरेंचे 'शिवसैनिक' यांचं सरकार"; देवेंद्र फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:21 IST

शिवसेनेने २०१९ मध्ये गद्दारीच केली; फडणवीसांचा थेट आरोप

Devendra Fadnavis BJP Shiv Sena Alliance: एकनाथ शिंदे हे येताना बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन बाहेर पडले. ज्यांच्या विरोधात इतके वर्षे शिवसेना लढली, त्यांच्यासोबत त्यांना बसावं लागत होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोज अपमान केला जात होता, बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलेल्यांसोबत बसावं लागत होतं, राष्ट्रीय सुरक्षेशी गद्दारी केलेल्या दाऊदशी संबंध असलेल्या लोकांसोबत कारभार करावा लागत होता. हे खऱ्या शिवसैनिकांना मान्य नव्हतं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा खऱ्या हिंदुत्वाचा विचार घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळेच, हे सरकार खऱ्या अर्थाने भाजपाचे 'हिंदूसैनिक' आणि बाळासाहेबांचे 'शिवसैनिक' यांचे सरकार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर स्पष्टीकरण

"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे ठरवून घडलं. अचानक घडलेलं नाही. भाजपा सत्तापिपासू नाही हे आम्ही दाखवून दिलं. एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांना सोबत घेऊन एक विचारांची लढाई लढत होते. अशा वेळी त्यांना शक्ती देणं आणि नेतृत्व देणं हे गरजेचं होतं. चंद्रकांत दादा म्हणाले त्याचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला", असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिले.

शिवसेनेने २०१९ मध्ये गद्दारीच केली!

"शिवसेनेने 2019 मध्ये भाजपाशी गद्दारी केली. मी साक्षीदार आहे की आम्ही कोणताही शब्द दिला नव्हता. पंतप्रधान मोदीजी, अमित शाह, उद्धव ठाकरे सारेच सांगत होते की फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवसेना राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. निवडणूक निकालाच्या आधीच, आमचे मार्ग खुले, असं ते सांगू लागले. मी फोन केले पण त्यांनी फोन घेतले नाहीत. कारण त्यांचं आधीच ठरलं होतं", असा आरोप फडणवीसांनी केला.

आता गतिशील सरकार सत्तेत!

"आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे. आता जनतेचं सरकार आलंय. राज-रोज पणे हे सरकार आलंय आणि आता खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं सरकार सत्तेत आहे. महाराष्ट्र आता वेगाने पुढे जाणार आहे. कारण महाविकास आघाडीने केवळ स्थगिती आणि चौकशी करण्यात पहिले ३० दिवस घालवले. पण शिंदे-फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि आता एक निर्णयक्षम आणि वेगवान गतिशील सरकार सत्तेत असल्याचे सर्वांनाच समाधान आहे", अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे