शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

Devendra Fadnavis: कोकणी माणसाशी पंगा घेतला तर पुढच्या चार पिढ्या…; देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 13:59 IST

एखाद्याशी पंगा घेतला की घरदार विकून देखील चार पिढ्या पंगा संपवल्याशिवाय थांबत नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते भाजपा आयोजित कोकण महोत्सवात बोलत होते. 

कोकणातली संस्कृती पाहता इथला आंबा जास्त गोड की लोक जास्त गोड असा प्रश्न मला पडतो. कोकणी माणूस अतिशय सरळ आणि निर्मळ आहे. पण त्याचवेळी एखाद्याशी पंगा घेतला की घरदार विकून देखील चार पिढ्या पंगा संपवल्याशिवाय थांबत नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते भाजपा आयोजित कोकण महोत्सवात बोलत होते. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील समृद्धता, पर्यटनाची ताकद आणि प्रकल्प अशा विविध गोष्टींवर भाष्य केलं. "कोकणची संस्कृती पाहता मला प्रश्न पडतो की कोकणातली आंबा जास्त गोड की इथले लोक जास्त गोड? कोकणी माणूस अतिशय सरळ आणि निर्मळ मनाचा आहे. पण त्याचवेळी एखाद्याशी पंगा घेतला की तो घरदार विकून देखील कोर्ट-कचेरी करुन चार पिढ्या हा पंगा संपवल्याशिवाय थांबत नाही. चांगूलपणा ही कोकणी माणसाची शिदोरी आहे. चांगल्याकडे दुर्लक्ष करू नका. चांगल्याला आणखी चांगलं कसं देता येईल हा आमचा प्रयत्न असेल", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

काही झालं तरी प्रदूषणकारी रिफायनरी आणणार नाहीनाणार प्रकल्पाच्या वादावरही फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "कोकणच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. काही झालं तरी कोकणात एकही प्रदूषणकारी रिफायनरी आणणार नाही. आम्ही आधीच सांगितलं होतं की नाणारमधली रिफायनरी ही ग्रीन रिफायनरी असणार आहे. या रिफायनरीमुळे कोकणातील १ लाख लोकांचा थेट रोजगार तर ५ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. तसंच रिफायनरीच्या कॅम्पसमध्ये ५ एकर जागेवर फक्त आणि फक्त ग्रीनरी करण्याची अट असणार आहे. पण काही लोकांना कोकणचा विकास नको आहे. लोकांच्या भावना भडकावून मतं घेऊन केवळ राजकारण त्यांना करायचं आहे. पण आम्ही कोकणात रिफायनरी करू दाखवू आणि कोकणचा विकास करुन दाखवू. इतकंच नव्हे, तर कोकणचं पर्यावरण आहे त्यापेक्षाही चांगलं करून दाखवू हा आमचा निर्धार आहे", असं फडणवीस म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस