शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Devendra Fadnavis: कोकणी माणसाशी पंगा घेतला तर पुढच्या चार पिढ्या…; देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 13:59 IST

एखाद्याशी पंगा घेतला की घरदार विकून देखील चार पिढ्या पंगा संपवल्याशिवाय थांबत नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते भाजपा आयोजित कोकण महोत्सवात बोलत होते. 

कोकणातली संस्कृती पाहता इथला आंबा जास्त गोड की लोक जास्त गोड असा प्रश्न मला पडतो. कोकणी माणूस अतिशय सरळ आणि निर्मळ आहे. पण त्याचवेळी एखाद्याशी पंगा घेतला की घरदार विकून देखील चार पिढ्या पंगा संपवल्याशिवाय थांबत नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते भाजपा आयोजित कोकण महोत्सवात बोलत होते. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील समृद्धता, पर्यटनाची ताकद आणि प्रकल्प अशा विविध गोष्टींवर भाष्य केलं. "कोकणची संस्कृती पाहता मला प्रश्न पडतो की कोकणातली आंबा जास्त गोड की इथले लोक जास्त गोड? कोकणी माणूस अतिशय सरळ आणि निर्मळ मनाचा आहे. पण त्याचवेळी एखाद्याशी पंगा घेतला की तो घरदार विकून देखील कोर्ट-कचेरी करुन चार पिढ्या हा पंगा संपवल्याशिवाय थांबत नाही. चांगूलपणा ही कोकणी माणसाची शिदोरी आहे. चांगल्याकडे दुर्लक्ष करू नका. चांगल्याला आणखी चांगलं कसं देता येईल हा आमचा प्रयत्न असेल", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

काही झालं तरी प्रदूषणकारी रिफायनरी आणणार नाहीनाणार प्रकल्पाच्या वादावरही फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "कोकणच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. काही झालं तरी कोकणात एकही प्रदूषणकारी रिफायनरी आणणार नाही. आम्ही आधीच सांगितलं होतं की नाणारमधली रिफायनरी ही ग्रीन रिफायनरी असणार आहे. या रिफायनरीमुळे कोकणातील १ लाख लोकांचा थेट रोजगार तर ५ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. तसंच रिफायनरीच्या कॅम्पसमध्ये ५ एकर जागेवर फक्त आणि फक्त ग्रीनरी करण्याची अट असणार आहे. पण काही लोकांना कोकणचा विकास नको आहे. लोकांच्या भावना भडकावून मतं घेऊन केवळ राजकारण त्यांना करायचं आहे. पण आम्ही कोकणात रिफायनरी करू दाखवू आणि कोकणचा विकास करुन दाखवू. इतकंच नव्हे, तर कोकणचं पर्यावरण आहे त्यापेक्षाही चांगलं करून दाखवू हा आमचा निर्धार आहे", असं फडणवीस म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस