शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा; “२०१४ मध्येच शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद मागितलं होतं, पण...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 14:35 IST

घरातून बाहेर पडायचं की नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. सगळं घरात बसून होत असतं तर कुठेही जायची गरज भासली नसती असा टोला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मुंबई – महाविकास आघाडी सरकारला २ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कामगिरीवर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे. नकारात्मक सिद्धातांवरुन स्थापन झालेलं सरकार सकारात्मक काम करु शकत नाही. सरकार आहे पण शासन नाही. गेल्या २ वर्षात उल्लेखनीय असं कुठलंही काम सरकारने केले नाही अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यावरुन देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, जे काही झाले ते वाहून गेले. जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात जिवंत राहावं लागतं. त्यावेळी जे उचित वाटलं ते आम्ही केले. २०१४ मध्ये राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विषय नव्हता. आम्ही शिवसेनेसोबतच जाणार होतो. सुरुवातीला शिवसेनेने(Shivsena) मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. पण आम्ही १२२ होतो. मग आवाजी मतदानानं सरकार स्थापन केले. तेव्हा राष्ट्रवादीने जी भूमिका घेतली त्याचा आम्हाला फायदा झाला. पण आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो नव्हतो असं त्यांनी सांगितले.

घरात बसण्याचं समर्थन मुख्यमंत्र्यांनी करु नये

घरातून बाहेर पडायचं की नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) ठरवावं. सगळं घरात बसून होत असतं तर कुठेही जायची गरज भासली नसती. कोरोना काळात प्रत्येक जिल्ह्यात, रुग्णालयात जात होतो. तिथली परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली का? घरात बसून सगळं चांगले दिसतं. पण त्याचे समर्थन करु नका. कोरोना हा देशभरात होता. केंद्रानेही या काळात चांगले काम केले. समाजातील कुठल्याही घटकाला हे सरकार न्याय देऊ शकले नाही. केवळ कांगावा करण्यात २ वर्ष घालवली. महाविकास आघाडीने काही माणसं ठेवली आहेत. जे रोज सकाळी उठून माध्यमात येऊन केंद्राकडे बोट दाखवत बसायचं हेच काम करत आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

खोटं बोलण्यात एकवाक्यता

सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात का झाले? सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात का? याचे उत्तर सरकारकडे आहे का? केंद्र सरकार आणि ICMR ने महाराष्ट्रामुळे देशाची परिस्थिती बिघडली हे का दाखवलं नाही? खोटं बोलण्यात एकवाक्यता आहे. एकजण खोटं बोलतो त्यामागे सगळेच त्याची री ओढतात. त्याची सत्यता तपासली जात नाही. आर्थिक परिस्थितीचं संकट केवळ महाराष्ट्रावर आलं का? कोविड काळात इतर राज्यांनी त्यांच्या येथील प्रत्येक घटकाला मदत केली. आम्ही १२ बलुतेदारांना मदत केली नाही. छोट्या दुकानदारांना मदत केली नाही. केंद्रानं पेट्रोल डिझेलचा कर कमी केला तर राज्याकडून साडेसहा रुपये कमी व्हायला हवे होते. पण राज्य सरकारने एकही पैसा कमी केला नाही. दारुवरचा कर कमी का केला? कोविड काळात दारु उत्पादकांचा परवाना शुल्क अर्धा केला. शेतकऱ्यांना पैसे नाही. १२ बलुतेदारांना पैसे नाही. सरकारचं प्राधान्य नेमकं कुणाला आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी सरकारला विचारला. झी २४ तासच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

गृहविभागाची परिस्थिती दयनीय

महाराष्ट्रातल्या गृहविभागाची परिस्थिती दयनीय आहे. सरकार कुणाचंही असो महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर सगळ्यांचा विश्वास आहे. पण पैसे देऊन बदल्या केल्या गेल्या. पोस्टिंग झाल्यानंतर ५ पटीने पैसे वसूल करण्यात येत आहे. अवैध दारु, अवैध वाळू उपसा असं बेधडक राज्यात सुरू आहे. एकदा सवयी बिघडल्या तर सुधरायला वेळ लागतो. आत्ताची गृह विभागाची परिस्थिती पाहून दु:खं वाटतं. कुठे पालकमंत्री, सत्ताधारी आमदार हे सगळं बिनधास्त करायला सांगतायेत असा आरोपही फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा