शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा; “२०१४ मध्येच शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद मागितलं होतं, पण...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 14:35 IST

घरातून बाहेर पडायचं की नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. सगळं घरात बसून होत असतं तर कुठेही जायची गरज भासली नसती असा टोला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मुंबई – महाविकास आघाडी सरकारला २ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कामगिरीवर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे. नकारात्मक सिद्धातांवरुन स्थापन झालेलं सरकार सकारात्मक काम करु शकत नाही. सरकार आहे पण शासन नाही. गेल्या २ वर्षात उल्लेखनीय असं कुठलंही काम सरकारने केले नाही अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यावरुन देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, जे काही झाले ते वाहून गेले. जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात जिवंत राहावं लागतं. त्यावेळी जे उचित वाटलं ते आम्ही केले. २०१४ मध्ये राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विषय नव्हता. आम्ही शिवसेनेसोबतच जाणार होतो. सुरुवातीला शिवसेनेने(Shivsena) मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. पण आम्ही १२२ होतो. मग आवाजी मतदानानं सरकार स्थापन केले. तेव्हा राष्ट्रवादीने जी भूमिका घेतली त्याचा आम्हाला फायदा झाला. पण आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो नव्हतो असं त्यांनी सांगितले.

घरात बसण्याचं समर्थन मुख्यमंत्र्यांनी करु नये

घरातून बाहेर पडायचं की नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) ठरवावं. सगळं घरात बसून होत असतं तर कुठेही जायची गरज भासली नसती. कोरोना काळात प्रत्येक जिल्ह्यात, रुग्णालयात जात होतो. तिथली परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली का? घरात बसून सगळं चांगले दिसतं. पण त्याचे समर्थन करु नका. कोरोना हा देशभरात होता. केंद्रानेही या काळात चांगले काम केले. समाजातील कुठल्याही घटकाला हे सरकार न्याय देऊ शकले नाही. केवळ कांगावा करण्यात २ वर्ष घालवली. महाविकास आघाडीने काही माणसं ठेवली आहेत. जे रोज सकाळी उठून माध्यमात येऊन केंद्राकडे बोट दाखवत बसायचं हेच काम करत आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

खोटं बोलण्यात एकवाक्यता

सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात का झाले? सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात का? याचे उत्तर सरकारकडे आहे का? केंद्र सरकार आणि ICMR ने महाराष्ट्रामुळे देशाची परिस्थिती बिघडली हे का दाखवलं नाही? खोटं बोलण्यात एकवाक्यता आहे. एकजण खोटं बोलतो त्यामागे सगळेच त्याची री ओढतात. त्याची सत्यता तपासली जात नाही. आर्थिक परिस्थितीचं संकट केवळ महाराष्ट्रावर आलं का? कोविड काळात इतर राज्यांनी त्यांच्या येथील प्रत्येक घटकाला मदत केली. आम्ही १२ बलुतेदारांना मदत केली नाही. छोट्या दुकानदारांना मदत केली नाही. केंद्रानं पेट्रोल डिझेलचा कर कमी केला तर राज्याकडून साडेसहा रुपये कमी व्हायला हवे होते. पण राज्य सरकारने एकही पैसा कमी केला नाही. दारुवरचा कर कमी का केला? कोविड काळात दारु उत्पादकांचा परवाना शुल्क अर्धा केला. शेतकऱ्यांना पैसे नाही. १२ बलुतेदारांना पैसे नाही. सरकारचं प्राधान्य नेमकं कुणाला आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी सरकारला विचारला. झी २४ तासच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

गृहविभागाची परिस्थिती दयनीय

महाराष्ट्रातल्या गृहविभागाची परिस्थिती दयनीय आहे. सरकार कुणाचंही असो महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर सगळ्यांचा विश्वास आहे. पण पैसे देऊन बदल्या केल्या गेल्या. पोस्टिंग झाल्यानंतर ५ पटीने पैसे वसूल करण्यात येत आहे. अवैध दारु, अवैध वाळू उपसा असं बेधडक राज्यात सुरू आहे. एकदा सवयी बिघडल्या तर सुधरायला वेळ लागतो. आत्ताची गृह विभागाची परिस्थिती पाहून दु:खं वाटतं. कुठे पालकमंत्री, सत्ताधारी आमदार हे सगळं बिनधास्त करायला सांगतायेत असा आरोपही फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा