शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा; “२०१४ मध्येच शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद मागितलं होतं, पण...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 14:35 IST

घरातून बाहेर पडायचं की नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. सगळं घरात बसून होत असतं तर कुठेही जायची गरज भासली नसती असा टोला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मुंबई – महाविकास आघाडी सरकारला २ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कामगिरीवर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे. नकारात्मक सिद्धातांवरुन स्थापन झालेलं सरकार सकारात्मक काम करु शकत नाही. सरकार आहे पण शासन नाही. गेल्या २ वर्षात उल्लेखनीय असं कुठलंही काम सरकारने केले नाही अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यावरुन देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, जे काही झाले ते वाहून गेले. जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात जिवंत राहावं लागतं. त्यावेळी जे उचित वाटलं ते आम्ही केले. २०१४ मध्ये राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विषय नव्हता. आम्ही शिवसेनेसोबतच जाणार होतो. सुरुवातीला शिवसेनेने(Shivsena) मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. पण आम्ही १२२ होतो. मग आवाजी मतदानानं सरकार स्थापन केले. तेव्हा राष्ट्रवादीने जी भूमिका घेतली त्याचा आम्हाला फायदा झाला. पण आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो नव्हतो असं त्यांनी सांगितले.

घरात बसण्याचं समर्थन मुख्यमंत्र्यांनी करु नये

घरातून बाहेर पडायचं की नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) ठरवावं. सगळं घरात बसून होत असतं तर कुठेही जायची गरज भासली नसती. कोरोना काळात प्रत्येक जिल्ह्यात, रुग्णालयात जात होतो. तिथली परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली का? घरात बसून सगळं चांगले दिसतं. पण त्याचे समर्थन करु नका. कोरोना हा देशभरात होता. केंद्रानेही या काळात चांगले काम केले. समाजातील कुठल्याही घटकाला हे सरकार न्याय देऊ शकले नाही. केवळ कांगावा करण्यात २ वर्ष घालवली. महाविकास आघाडीने काही माणसं ठेवली आहेत. जे रोज सकाळी उठून माध्यमात येऊन केंद्राकडे बोट दाखवत बसायचं हेच काम करत आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

खोटं बोलण्यात एकवाक्यता

सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात का झाले? सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात का? याचे उत्तर सरकारकडे आहे का? केंद्र सरकार आणि ICMR ने महाराष्ट्रामुळे देशाची परिस्थिती बिघडली हे का दाखवलं नाही? खोटं बोलण्यात एकवाक्यता आहे. एकजण खोटं बोलतो त्यामागे सगळेच त्याची री ओढतात. त्याची सत्यता तपासली जात नाही. आर्थिक परिस्थितीचं संकट केवळ महाराष्ट्रावर आलं का? कोविड काळात इतर राज्यांनी त्यांच्या येथील प्रत्येक घटकाला मदत केली. आम्ही १२ बलुतेदारांना मदत केली नाही. छोट्या दुकानदारांना मदत केली नाही. केंद्रानं पेट्रोल डिझेलचा कर कमी केला तर राज्याकडून साडेसहा रुपये कमी व्हायला हवे होते. पण राज्य सरकारने एकही पैसा कमी केला नाही. दारुवरचा कर कमी का केला? कोविड काळात दारु उत्पादकांचा परवाना शुल्क अर्धा केला. शेतकऱ्यांना पैसे नाही. १२ बलुतेदारांना पैसे नाही. सरकारचं प्राधान्य नेमकं कुणाला आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी सरकारला विचारला. झी २४ तासच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

गृहविभागाची परिस्थिती दयनीय

महाराष्ट्रातल्या गृहविभागाची परिस्थिती दयनीय आहे. सरकार कुणाचंही असो महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर सगळ्यांचा विश्वास आहे. पण पैसे देऊन बदल्या केल्या गेल्या. पोस्टिंग झाल्यानंतर ५ पटीने पैसे वसूल करण्यात येत आहे. अवैध दारु, अवैध वाळू उपसा असं बेधडक राज्यात सुरू आहे. एकदा सवयी बिघडल्या तर सुधरायला वेळ लागतो. आत्ताची गृह विभागाची परिस्थिती पाहून दु:खं वाटतं. कुठे पालकमंत्री, सत्ताधारी आमदार हे सगळं बिनधास्त करायला सांगतायेत असा आरोपही फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा