शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विधान परिषदेच्या निवडणुकीत BJP ला फटका; देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही चिंतन करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 23:49 IST

अमरावती पदवीधर निवडणुकीत आम्हाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. याठिकाणी काही मते आम्हाला कमी पडली आहेत असं फडणवीस म्हणाले.

मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. परंतु अमरावतीत भाजपाला कडवी झुंज द्यावी लागली. नागपूरमध्ये भाजपा पुरस्कृत उमेदवाराचा पराभव झाला. औरंगाबादेतही भाजपाला पराभव स्वीकारावा लागला. तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काही गोष्टी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्यात तर काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे झाल्या नाहीत. त्यावर आम्ही चिंतन करू. त्यात काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्या करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज ज्या निवडणुका झाल्यात त्यात मला आनंद आहे. कोकणची जागा बऱ्याच कालांतरानंतर भाजपा जिंकली आहे. त्याचवेळी नागपूरची जागा आम्ही जिंकू शकलो नाही. नागपूरची जागा शिक्षक परिषदेने लढली. कोकण, नागपूर या दोन्ही जागा शिक्षक परिषद लढायच्या. या दोन्ही जागा भाजपाला लढवायला द्याव्यात असा आग्रह आमचा होता पण कोकणाचा आमचा आग्रह त्यांनी मान्य केला. नागपूरमध्ये आम्ही सुचवलं होतं की, शिक्षक परिषद या जागेवर निवडून येऊ शकणार नाही. भाजपा या जागेवर निवडून येऊ शकेल. त्यांचा आग्रह असल्याने शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला आम्ही समर्थन दिले. पण त्याठिकाणी ती जागा निवडून येऊ शकली नाही. आम्हाला त्याचे दु:ख आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच अमरावती पदवीधर निवडणुकीत आम्हाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. याठिकाणी काही मते आम्हाला कमी पडली आहेत त्यामुळे नक्कीच त्याचा विचार हा पार्टी करेल. त्याठिकाणी अवैध झालेल्या मतांची संख्या मोठी आहे. त्यात आमच्या उमेदवाराला पडलेल्या अवैध मतांची संख्या जास्त आहे. त्याचाही विचार आम्हाला करावा लागेल. मराठवाड्यात पक्षाने चांगल्यारितीने ही जागा लढवली याचं समाधान आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. 

दरम्यान, नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांचे अभिनंदन करेन. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन तांबे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. अपक्ष म्हणून निवडणूक लढवूनही सत्यजित तांबे अतिशय भरघोस मतांनी निवडून आलेत. त्यांनादेखील माझ्या शुभेच्छा आहेत असं फडणवीसांनी सांगितले. त्याचसोबत आगामी काळात कसबा, चिंचवड २ पोटनिवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपाची तयारी सुरू आहे. आम्हाला विश्वास आहे या दोन्ही पोटनिवडणुका आम्ही जिंकू असंही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSatyajit Tambeसत्यजित तांबे