शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची निर्यातबंदी, शेतकऱ्यांची कोंडी; फडणवीसांनी सांगितली सरकारची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 18:11 IST

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यातबंदीबाबत सरकारची बाजू मांडत शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपूर :कांदाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारवर चहूबाजूने टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत या मुद्द्यावरून केंद्रासह राज्य सरकारलाही कोंडीत पकडत आक्रमक आंदोलने सुरू केली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज चांदवड येथे रास्तारोको आंदोलनात सहभाग घेत कांदा प्रश्नावरून सरकारविरोधात हल्लाबोल केला. तर दुसरीकडे, राज्य विधिमंडळ अधिवेशनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला प्रश्न विचारत धारेवर धरलं. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची बाजू मांडत शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

"कांद्याच्या प्रश्नावर मी स्वतः केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र निर्यात बंदी मागे घेतली तर कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे. कारण यंदा २५ ते ३० टक्के कमी कांदा बाजारात आला आहे. मात्र तरीही आम्ही केंद्र सरकारला मार्ग काढण्याची विनंती केली आहे," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच शेतकऱ्यांचे आम्ही अजिबात नुकसान होऊ देणार नाही, लिलावात अडचणी आल्या तर सरकार दर जाहीर करून कांदा खरेदी करेल, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं आहे. 

गेल्यावेळीचे कांद्याचे अनुदान सहकारी बँकांनी दिले असले तरी राष्ट्रीय बँकांनी मात्र हे अनुदान दिलं नसल्याचा मुद्दा काही आमदारांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "संपूर्ण अनुदान वितरित करण्यात आले आहे. ते कुणी दिले नसेल आणि कर्ज खात्यात वळते केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल."

कृषीमंत्री आणि पणनमंत्री पुन्हा घेणार पियुष गोयल यांची भेट

कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री आणि पणनमंत्री पुन्हा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटणार असून यातून नक्कीच मार्ग निघेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांना व्यक्त केला आहे.

दरम्यान, कांदा प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनावर समाधानी होत विरोधी पक्ष आपलं आंदोलन थांबवणार का आणि सरकारकडून याबाबत आगामी काळात नेमकी काय पावलं उचलली जातात, हे पाहावं लागेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसonionकांदाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAmbadas Danweyअंबादास दानवे