शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

व्यासपीठावरच देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 16:26 IST

मागील ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला सिंचनासाठी ३० हजार कोटी रुपये दिले. त्यामुळे महाराष्ट्रात सिंचनाचे इतके प्रकल्प राज्यात उभे करू शकलो असं फडणवीस म्हणाले.

शिर्डी – महाराष्ट्रातील ५० टक्के भागात दुष्काळ आहे. जोपर्यंत या परिसरात पाणी पोहचत नाही तोवर शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही. आमच्याकडे आराखडा तयार आहे, त्या प्रकल्पांना केंद्राने मदत केली महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यासपीठावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्र सरकारच्या निधीची मागणी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील ५० टक्के असा भाग आहे जो दुष्काळग्रस्त आहे.  ज्याठिकाणी पाऊस जास्त पडत नाही. पाणी नाही. या भागाला जोपर्यंत पाणी पोहचवत नाही तोवर महाराष्ट्राला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही. केवळ तुमच्या आशीर्वादाने आम्ही हे करू शकतो. पश्चिमी नद्यांचे पाणी जे समुद्रात जाते, ते गोदावरीत आणून अहमदनगरपासून संपूर्ण मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करू शकतो असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत या योजनेची पूर्ण व्यवस्था, संपूर्ण आराखडा आम्ही तयार केला आहे. प्रकल्पही तयार केलाय. त्याचसोबत विदर्भात वैनगंगा नदीतून वाहणाऱ्या १०० टीएमसी पाण्यापैकी ६७ टीएमसी पाणी आपण दुष्काळग्रस्त भागातून नळगंगापर्यंत आणू शकतो. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला आपण कायम दुष्काळमुक्त करू शकतो. तुम्ही आशीर्वाद द्या, याआधीही केंद्राने मदत केली आहे आणखी थोडी मदत या प्रकल्पांना केंद्र सरकारने केली तर आमच्या पिढीने महाराष्ट्रात दुष्काळ पाहिला परंतु येणारी पिढी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात दुष्काळ पाहणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

९ वर्षात ३० हजार कोटी केंद्राने दिले

मागील ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला सिंचनासाठी ३० हजार कोटी रुपये दिले. त्यामुळे महाराष्ट्रात सिंचनाचे इतके प्रकल्प राज्यात उभे करू शकलो. पंतप्रधानांपासून प्रेरणा घेऊन आम्हीदेखील ज्याप्रकारे शेतकऱ्यांना निधी दिला जातो तसे महाराष्ट्रानेही निर्णय घेतला आणि नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली. निळवंडे सारखा प्रकल्प सुरुवात माझ्या जन्माच्या आधी झाली होती. आज त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतंय म्हणजे कित्येक वर्ष लोकांनी हा प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहिली. २०१६-१७ मध्ये आम्ही निळंवडे प्रकल्पाला चालना दिली, विशेष निधी उपलब्ध करून दिला. राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड हे त्यावेळी विरोधात होते. परंतु त्यांनी सहकार्य केले त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. आज एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात त्याचेही उद्घाटन झाले आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प