शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यावर फडणवीस ठाम; 'त्या' पत्रकार परिषदेनंतरही बरंच काही घडलं!

By यदू जोशी | Updated: June 6, 2024 10:59 IST

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाला लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची किनार नक्कीच आहे, पण विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवून ते मंत्रिमंडळातून बाहेर पडू इच्छितात असे मानले जाते आहे.

>> यदु जोशी

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पक्षसंघटनेत काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर आता ते खरंच राजीनामा देणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे. राजीनाम देण्यावर ते अत्यंत ठाम असल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं. भाजपाचे राज्यातील सगळेच नेते, राजीनामा देऊ नका, म्हणून त्यांची मनधरणी करत असले, तरी स्वतः फडणवीस आपला निर्णय बदलण्याची शक्यता नसल्याचं समजतं. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाला लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची किनार नक्कीच आहे, पण विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवून ते मंत्रिमंडळातून बाहेर पडू इच्छितात असे मानले जाते आहे. राज्यातील शिंदे सरकारला आणखी चार महिने राहिले. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागेल. या चार महिन्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री राहण्यापेक्षा पक्षासाठी झोकून काम करण्याचा मानस फडणवीस यांनी पक्का केल्याचं निकटवर्तीय सांगतात.

पत्रकार परिषदेनंतर काय झालं?

उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. त्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वास्तविक, पत्रकार परिषदेपूर्वी भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची एक बैठक प्रदेश कार्यालयातील वरच्या माळ्यावरील सभागृहात झाली. त्या बैठकीत फडणवीस म्हणाले की, राज्यातील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं मी पत्रपरिषदेत जाहीर करणार आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह दोन नेत्यांनी, असं न करण्याचं मत मांडलं. पराभव काही तुमच्यामुळे झालेला नाही, ही सामूहिक जबाबदारी असते, तुम्ही एकट्याने जबाबदारी घेण्याची गरज नाही, असं त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण, फडणवीस जबाबदारी स्वीकारण्यावर ठाम राहिले. 

त्यानंतर, पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. 'मी कमी पडलो, महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो', हे त्यांनी जाहीर केलंच; पण सरकारच्या जबाबदारीतून मला मुक्त करण्याची विनंती मी पक्षनेतृत्वाला करणार असल्याचं सांगत, उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद सोडण्याचेही संकेत दिले. तेव्हा, बैठकीतील जे नेते पत्रकार परिषदेत बसले होते, तेही अवाक् झाले. अशी काही भूमिका फडणवीस घेतील याची कुणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा नेतेमंडळी फडणवीसांना सभागृहात घेऊन गेली. आपण फक्त जबाबदारी स्वीकारणार होतात, मग राजीनाम्याबद्दल कसं काय बोललात, अशी विचारणा या नेत्यांनी केली. तेव्हा फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

ते म्हणाले, "भाजपाला विधानसभा निवडणुकीत ताकद द्यायची असेल, तर माझं बाहेर राहून काम करणं गरजेचे आहे. मी पक्षात राहून काम केलं तर सरकार आणि पक्ष या दोन्हींवर होणाऱ्या आरोपांचं जोरदार प्रत्युत्तर देऊ शकेन. शिवाय, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मला वेळ मिळेल. मंत्रिपद महत्त्वाचे नाही, पक्ष सर्वात महत्त्वाचा आहे." बुधवारी आणि गुरुवारी अनेक फडणवीसांना भेटले, फोनवर बोलले, राजीनामा न देण्याबाबत त्यांना समजावले. मात्र, ते राजीनाम्यावर ठाम आहेत. आता दिल्लीत जाऊन ते पक्षनेतृत्वासमोर कोणती भूमिका मांडतात आणि वरिष्ठ त्यांना कोणता आदेश देतात, याबद्दल उत्सुकता आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा