शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Devendra Fadnavis: 'मविआ सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली नाही, पण...', देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 20:12 IST

'मागच्या सरकारने जाहीर केलेली मदत आणि मिळालेली मदत यात 9 महिन्याचे अंतर होते. आमच्या सरकारने तात्काळ निर्णय घेतला.'

मुंबई: उद्या म्हणजेच 17 ऑगस्टपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. अधिवेशनात यंदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाडंगी पाहायला मिळेल. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनीमहाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत महत्वाची माहिती दिली.

'मविआ सरकारचे निर्णय स्थगित केले नाही'महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकार स्थगिती देत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्याबाबाबत बोलताना कोणत्याच निर्णयांना स्थगिती दिली नसल्याचे फडणवीसांनी सांगितले. ते म्हणाले की, 'आम्ही कुठल्याही निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. आम्ही फक्त त्या निर्णयांचे पुनरावलोकन करत आहोत. कारण 100 रुपये गरज आहे तिथे 500 रुपये वाटले गेले आहेत. त्यामुळे आम्ही त्याची माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ. जनतेच्या हिताचे निर्णय हे सरकार घेणार आहे,' असे फडणवीस म्हणाले.

संबंधित बातमी- 'मविआ बेईमानीचे सरकार, जनतेचा कौल डालवून...', देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

'लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल'ते पुढे म्हणाले की, 'मागच्या सरकारने जाहीर केलेली मदत आणि मिळालेली मदत यात 9 महिन्याचे अंतर होते. आमच्या सरकारने तात्काळ निर्णय घेतला. पुरवणी मागण्या झाल्यानंतर आम्ही मदत द्यायला सुरुवात करू. आम्ही आताही मदत देऊ शकतो, पण 95 टक्के पंचनामे झाले आहेत, 5 टक्के बाकी आहेत. काही ठिकाणी पंचनाम्याबाबत तक्रारी आहेत, त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचेल,' असंही फडणवीस म्हणाले.

'मविआ बेईमानीचे सरकार'पत्रकार परिषदेत मविआ सरकारवर टीका करताना फडणवीसांनी दोन्ही सरकारमधील फरक स्पष्ट करुन सांगितला. ते म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारमध्ये एकी नव्हती, त्यामुळे त्यांच्या काळात जनतेच्या हिताचे निर्णय प्रलंबित राहिले. फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही, तर सर्वच क्षेत्रासाठी मविआ बेईमानीचे आणि नुकसानीचे सरकार होते. जनतेचा कौल डालवून ते सरकार स्थापन झालं होतं. पण, आता विधानसभा निवडणुकीत ज्यांनी एकत्रित येऊन मते मागितली होती, ते दोन पक्ष आज सत्तेत आले आहेत,' असं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी