शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

Devendra Fadnavis: 'मविआ सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली नाही, पण...', देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 20:12 IST

'मागच्या सरकारने जाहीर केलेली मदत आणि मिळालेली मदत यात 9 महिन्याचे अंतर होते. आमच्या सरकारने तात्काळ निर्णय घेतला.'

मुंबई: उद्या म्हणजेच 17 ऑगस्टपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. अधिवेशनात यंदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाडंगी पाहायला मिळेल. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनीमहाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत महत्वाची माहिती दिली.

'मविआ सरकारचे निर्णय स्थगित केले नाही'महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकार स्थगिती देत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्याबाबाबत बोलताना कोणत्याच निर्णयांना स्थगिती दिली नसल्याचे फडणवीसांनी सांगितले. ते म्हणाले की, 'आम्ही कुठल्याही निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. आम्ही फक्त त्या निर्णयांचे पुनरावलोकन करत आहोत. कारण 100 रुपये गरज आहे तिथे 500 रुपये वाटले गेले आहेत. त्यामुळे आम्ही त्याची माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ. जनतेच्या हिताचे निर्णय हे सरकार घेणार आहे,' असे फडणवीस म्हणाले.

संबंधित बातमी- 'मविआ बेईमानीचे सरकार, जनतेचा कौल डालवून...', देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

'लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल'ते पुढे म्हणाले की, 'मागच्या सरकारने जाहीर केलेली मदत आणि मिळालेली मदत यात 9 महिन्याचे अंतर होते. आमच्या सरकारने तात्काळ निर्णय घेतला. पुरवणी मागण्या झाल्यानंतर आम्ही मदत द्यायला सुरुवात करू. आम्ही आताही मदत देऊ शकतो, पण 95 टक्के पंचनामे झाले आहेत, 5 टक्के बाकी आहेत. काही ठिकाणी पंचनाम्याबाबत तक्रारी आहेत, त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचेल,' असंही फडणवीस म्हणाले.

'मविआ बेईमानीचे सरकार'पत्रकार परिषदेत मविआ सरकारवर टीका करताना फडणवीसांनी दोन्ही सरकारमधील फरक स्पष्ट करुन सांगितला. ते म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारमध्ये एकी नव्हती, त्यामुळे त्यांच्या काळात जनतेच्या हिताचे निर्णय प्रलंबित राहिले. फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही, तर सर्वच क्षेत्रासाठी मविआ बेईमानीचे आणि नुकसानीचे सरकार होते. जनतेचा कौल डालवून ते सरकार स्थापन झालं होतं. पण, आता विधानसभा निवडणुकीत ज्यांनी एकत्रित येऊन मते मागितली होती, ते दोन पक्ष आज सत्तेत आले आहेत,' असं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी