शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 17:04 IST

आजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात.

मुंबईः मराठा समाजाचं वर्चस्व राहिलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण नेत्यानं मुख्यमंत्री होणं, पाच वर्षं हे पद भूषवणं, इतकंच नव्हे तर सत्ता गेल्यावरही आपलं वजन कायम राखणं यावर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली आहे. कारण, आजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपलं ब्राह्मण असणं आणि एकूण जातीव्यवस्थेवर अत्यंत ठाम  मत मांडलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘थेट’ भाजपाला सत्तास्थापनेची ऑफर होती. थेट म्हणजे शरद पवारांनी दिली होती. या संदर्भात योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. अगदी वरिष्ठ पातळीवर बोलणी झाली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी अचानक आपली भूमिका बदलली आणि आम्ही ‘कॉर्नर’ झालो, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी ‘द इनसायडर’ला दिलेल्या मुलाखतीत केला. तेव्हा, शरद पवारांनी भूमिका बदलण्याला तुमचं ‘फडणवीस’ असणं जबाबदार आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘‘फडणवीस आडनाव असल्यामुळे काय-काय भूमिका बदलतात, हे बऱ्याचदा बघितलं. पवारांच्याही आणि इतरांच्याही. पण, गेलं ते गेलं. एवढं मात्र नक्की की, गेल्या पाच वर्षांत माझ्यावर अटॅक करायला एकच शस्त्र  त्यांच्याकडे होतं. मला याचा आनंद आहे. माझ्यावर टीका करण्यासाठी केवळ आणि केवळ माझ्या जातीचाच उपयोग त्यांना करावा लागला. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांच्या पुरोगामित्वाचा बुरखा फाटला.’’

देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट; भाजपासोबत सरकार बनवायची थेट शरद पवारांची होती ऑफर, पण...

महायुतीचं सरकार असताना राष्ट्रवादी भाजपासोबत यायला तयार होती, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले...

तुम्हाला ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का, या प्रश्नावरही देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सुस्पष्ट उत्तर दिलं.  जातीचा अभिमान वाटण्याचे दिवस नाहीत. तुमचं कर्तृत्त्व चांगलं असेल तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्याकडे जातिव्यवस्थेचा जरा अतिरेकच दिसतो. कुणी खालचा, कुणी वरचा, हा हिंदू धर्मच नाही. या उच्च-नीचतेचा तिरस्कारच केला पाहिजे. कर्तृत्त्वाचा अभिमान बाळगला पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं.  

राज ठाकरेंच्या भेटीमागे दडलंय काय?

शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसेने झेंडा बदलला. हिंदुत्वाचा नारा दिला. त्यामुळे, या भेटीमागे काही रहस्य होते का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले, "राज ठाकरे यांना आपण जवळून ओळखता. कुणाच्या म्हणण्याने ते काही करतील असे नाही. राज ठाकरे यांना त्या-त्या वेळची राजकीय परिस्थिती समजते. कुठे पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कशी भरुन काढायची हे समजते. ते कुणाच्या सांगण्यावरून काही करतील असे वाटत नाही. राज ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे जाण्याने माझा त्यांच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढला."

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'

'ट्रोलिंगसाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेनं प्रचंड फेक अकाऊंट तयार केलेत'

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019