शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 17:04 IST

आजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात.

मुंबईः मराठा समाजाचं वर्चस्व राहिलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण नेत्यानं मुख्यमंत्री होणं, पाच वर्षं हे पद भूषवणं, इतकंच नव्हे तर सत्ता गेल्यावरही आपलं वजन कायम राखणं यावर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली आहे. कारण, आजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपलं ब्राह्मण असणं आणि एकूण जातीव्यवस्थेवर अत्यंत ठाम  मत मांडलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘थेट’ भाजपाला सत्तास्थापनेची ऑफर होती. थेट म्हणजे शरद पवारांनी दिली होती. या संदर्भात योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. अगदी वरिष्ठ पातळीवर बोलणी झाली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी अचानक आपली भूमिका बदलली आणि आम्ही ‘कॉर्नर’ झालो, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी ‘द इनसायडर’ला दिलेल्या मुलाखतीत केला. तेव्हा, शरद पवारांनी भूमिका बदलण्याला तुमचं ‘फडणवीस’ असणं जबाबदार आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘‘फडणवीस आडनाव असल्यामुळे काय-काय भूमिका बदलतात, हे बऱ्याचदा बघितलं. पवारांच्याही आणि इतरांच्याही. पण, गेलं ते गेलं. एवढं मात्र नक्की की, गेल्या पाच वर्षांत माझ्यावर अटॅक करायला एकच शस्त्र  त्यांच्याकडे होतं. मला याचा आनंद आहे. माझ्यावर टीका करण्यासाठी केवळ आणि केवळ माझ्या जातीचाच उपयोग त्यांना करावा लागला. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांच्या पुरोगामित्वाचा बुरखा फाटला.’’

देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट; भाजपासोबत सरकार बनवायची थेट शरद पवारांची होती ऑफर, पण...

महायुतीचं सरकार असताना राष्ट्रवादी भाजपासोबत यायला तयार होती, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले...

तुम्हाला ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का, या प्रश्नावरही देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सुस्पष्ट उत्तर दिलं.  जातीचा अभिमान वाटण्याचे दिवस नाहीत. तुमचं कर्तृत्त्व चांगलं असेल तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्याकडे जातिव्यवस्थेचा जरा अतिरेकच दिसतो. कुणी खालचा, कुणी वरचा, हा हिंदू धर्मच नाही. या उच्च-नीचतेचा तिरस्कारच केला पाहिजे. कर्तृत्त्वाचा अभिमान बाळगला पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं.  

राज ठाकरेंच्या भेटीमागे दडलंय काय?

शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसेने झेंडा बदलला. हिंदुत्वाचा नारा दिला. त्यामुळे, या भेटीमागे काही रहस्य होते का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले, "राज ठाकरे यांना आपण जवळून ओळखता. कुणाच्या म्हणण्याने ते काही करतील असे नाही. राज ठाकरे यांना त्या-त्या वेळची राजकीय परिस्थिती समजते. कुठे पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कशी भरुन काढायची हे समजते. ते कुणाच्या सांगण्यावरून काही करतील असे वाटत नाही. राज ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे जाण्याने माझा त्यांच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढला."

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'

'ट्रोलिंगसाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेनं प्रचंड फेक अकाऊंट तयार केलेत'

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019