शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला; "भाजपाचा जन्म हिंदुत्वाच्या विचारातून, पण.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 18:08 IST

भारतात जन्म आणि भाजपासोबत काम करण्याची संधी यापेक्षा जीवनात मोठं काहीच असू शकत नाही. ते आम्हाला सगळ्यांना मिळालं त्याचे समाधान आहे असं फडणवीसांनी सांगितले.  

पुणे – हिंदुत्व ही संकुचित संकल्पना नाही. ही भू-सांस्कृतिक राष्ट्रवादाशी जोडलेली संकल्पना आहे. इथल्या मूळ विचारांना मानतात ती ही संस्कृती आहे. या हिंदुत्वाचा विचार भाजपा घेऊन चालली आहे. काही पक्षाने हिंदुत्वाची शाल पांघरलेली असेल. पण आम्ही हिंदुत्व विचारातूनच जन्माला आलोय. राष्ट्रवादातून जनसंघ, भाजपाची वाटचाल सुरू झाली अशा शब्दात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपा – काल, आज आणि उद्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वात भारत पुढे चालला आहे. कोरोना काळात भारताने सामना केला. आम्ही लस निर्मिती करू शकतो आणि कोट्यधीश लोकांना लसीचा पुरवठा करू शकतो ही भारताची क्षमता तयार झाली आहे. रशिया यूक्रेन हल्ल्यात अमेरिकेने दबाव आणला तरी भारताने स्पष्ट सांगितले आम्हाला भारतीयांचे हित पाहायचं आहे. अमेरिकेचे नाही. राष्ट्रवादाचा शाश्वत विचार, गरिबांचा विकास यातून भारत पुढे जाणार आहे. भारतात जन्म आणि भाजपासोबत काम करण्याची संधी यापेक्षा जीवनात मोठं काहीच असू शकत नाही. ते आम्हाला सगळ्यांना मिळालं त्याचे समाधान आहे असं त्यांनी सांगितले.  

तसेच भाजपाचा इतिहास आणि वर्तमान त्याचे भविष्य सामान्यांपर्यंत पोहचवण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. एका शाश्वत विचाराला अंमलात आणणारी जी संघटना आहे त्याचं हे पुस्तक आहे. या पुस्तकात सगळा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही निवडणुका जिंकण्याची मशीन नाही. लोकशाहीत निवडणुका जिंकल्यावर अपेक्षित परिणाम करता येऊ शकतो त्यासाठी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करतो. देशात २२ पक्षाच सरकार अटल बिहारी वाजपेयींनी आणलं तेव्हा किमान समान कार्यक्रम आखला गेला. तेव्हा वाजपेयींनी सांगितले होते जेव्हा भाजपाचं सरकार येईल तेव्हा कलम ३७० आणि राम मंदिर बांधू. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार आणल्यानंतर आपण ते पूर्ण केले असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

भारतीय संस्कृती, इतिहासाचा वाहक भाजपा

भारतीय संस्कृती, इतिहास यांचा वाहक कोण असेल तर भाजपा आहे. या देशाला पारतंत्र्यात टाकण्याकरता समाजाचं आत्मभान भंग करण्याचं काम होते. आमच्यावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येकाला हे माहिती होते कारण तुम्ही ज्यांना ईश्वर मानता त्यांना खंडीत करून तुमच्यावर राज्य करू शकतो हे दाखवण्यासाठी केले जातो. भारतीय समाजाचा तेजोभंग करून आत्मभान हरवलेले तर लोकं गुलामीत जातात. तसेच संघर्ष झाला तर त्याचा इतिहासात दाखला दिला जातो. भारताची संस्कृती, सभ्यता जगात सर्वश्रेष्ठ आहे. अलीकडच्या काळात डीएनए टेस्टिंग पुढे आली आहे. या थिअरीला तंत्रज्ञानानं महत्त्व दिलं आहे. बंगालमधील ब्राम्हण, दक्षिणेतील नायर, यूपीतील दलित समाजातील बांधव यांचा डीएनए एकच आहे. जगातील सर्वात जुनी संस्कृती भारतीय संस्कृती आहे. आपल्यापेक्षा जुनी भाषा जगात कुठेही नाही. आम्हाला दुसऱ्याचा विचार घेण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही विषमतेच्या विषवल्लीशिवाय एक भारतीय समाज म्हणून जगासमोर जावू तेव्हा भारताला कुणीही रोखू शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा