शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

"अरे वेड्या, फडणवीसांनी पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागितली, पण..."; रामदास कदम उद्धव ठाकरेंवर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:14 IST

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांना डिवचले. त्यांच्या टीकेला रामदास कदम यांनी उत्तर दिले. 

Shinde Thackeray News: राज्यात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा राजकीय संग्राम सुरू झाला आहे. शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाराजीच्या मुद्द्यांवरून डिवचलं. ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पलटवार केला. 'उद्धव ठाकरेंना एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे', असे म्हणत कदमांनी ठाकरेंवर हल्ला चढवला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एका मुलाखतीत बोलताना रामदास कदम म्हणाले, "नियतीने त्यांना धडा शिकवला. ९० उमेदवार उभे केले होते. फक्त २० आमदार निवडून आले. ते देखील राहतील की नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांना वैफल्य आलेलं आहे. वैफल्यामधून त्यांची बडबड सुरू आहे, असं म्हटलं तर चुकीचं वाटणार नाही."

तुम्ही लंडनला कशासाठी जाता? कदमांचा ठाकरेंना सवाल

"त्यांनी (उद्धव ठाकरे) एकनाथ शिंदेंना असं म्हटलं आहे की, 'रुसू बाई रुसू आणि गावात जाऊन बसू.' एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा आहेत. गावात शेती आहे. शेती करण्यासाठी जातात, हे सगळ्यांना माहिती आहे. पण, उद्धवजी, आपण लंडनला कशासाठी जाता? महाराष्ट्रात मिठाईचे खोके गोळा करून घेऊ आणि लंडनमध्ये जाऊन बसू असं काही आहे का आपलं? तुमचं काय आहे, ते बघा?", असा उलट सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला.  

"शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने ८० उमेदवार उभे केले, ६० आमदार निवडून आणले. यांनी (उद्धव ठाकरे) आता शिंदेंवर बोलणं थांबवायला हवं. त्यांनी स्वतःचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला कल्पना आहे की, शिवसेनाप्रमुखांनी शेवटपर्यंत कुठलंही पद घेतलं नाही. त्यांनी रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला. उद्धव ठाकरे एवढे स्वार्थी आहेत, त्यांना मुख्यमंत्रि‍पदावर बसायचं होतं. त्यांना वर्षा बंगल्यावर जायची घाई होती म्हणून शिवसेना फुटली", अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'उद्धवजी, मला मातोश्रीवर यायचं आहे'

"उद्धव ठाकरेंच्या कालच्या (२३ जानेवारी) सभेत किती खुर्च्या खाली होत्या. समोर खुर्च्या खाली असताना हा उद्धव ठाकरे वेड्यासारखं काय बडबडतोय? हा वाटेल ते बडबडतोय. हा अमित शाह यांच्यावर बोलतोय. अरे वेड्या, देवेंद्र फडणवीसांनी पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागितली होती. 'उद्धवजी, मला मातोश्रीवर यायचं आहे.' हे म्हणाले, नाही. माझे दरवाजे तुमच्यासाठी बंद. अरे तुमचे दरवाजे बंद केले. मग आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर लाचारासारखा पुप्षगुच्छ घेऊन भेटायला कशाला गेला होता? लाज गुंडाळली का? शिवसेनाप्रमुखांचे चिरंजीव आहात, त्याची थोडी जनाची नाही, तर मनाची ठेवायला पाहिजे", अशी टीका रामदास कदम यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदमEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना