शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

'रिफायनरीला विरोध कुणी केला? 3.5 लाख कोटींची गुंतवणूक घालवली', फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 20:54 IST

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मुंबई: वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. हा प्रकल्प सुरुवातीला महाराष्ट्रात येणार होता, पण ऐनवेळी तो गुजरातला हलवण्यात आला. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपले मत मांडले, तसेच रिफायनरी प्रकल्पावरुन शिवसेनेवर टीकाही केली.

5 लाख लोकांना रोजगार मिळाला असतादेवेंद्र फडणवीस म्हणाले की, '3 लाख 50 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. या गुंतवणुकीने 5 लाख लोकांना आपण रोजगार देऊ शकलो असतो. सर्व शासकीय ऑईल कंपन्या आणि पार्टनर म्हणून मिडल ईस्टची कंपनी ही रिफायनरी उभारणार होते. गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगरच्या रिफायनरीचा आणि मुंद्रा पोर्टचा मोठा वाटा आहे. जामनगरच्या रिफायनरीपेक्षा चारपट मोठी रिफायनरी राज्यात आली असती.'

शिवसेनेमुळे मोठा प्रकल्प गेला'ही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक होती. या रिफायनरीमुळे महाराष्ट्र खूप पुढे गेला असता. पण त्या रिफायनरीला शिवसेनेने विरोध केला, ती राज्यात होऊ दिली नाही. आम्ही त्यावर विचार कर आहोत, पण आता ती स्केल डाऊन झाली आहे. ती आता साडे तीन लाख कोटीची राहिली नाही. राज्यात होणारी एवढी मोठी गुंतवणूक सेनेने घालवली,' अशी टीका फडणवीसांनी केली. 

येत्या काळात नवीन प्रोजेक्ट आणू'गुजरात भारतातील राज्य आहे, हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलो होते. पण, सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती, त्यामुळे अधिकचा आग्रह करता आला नाही.  पण, आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार,' असे आश्वासनही फडणवीसांनी यावेळी दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना