शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

'रिफायनरीला विरोध कुणी केला? 3.5 लाख कोटींची गुंतवणूक घालवली', फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 20:54 IST

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मुंबई: वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. हा प्रकल्प सुरुवातीला महाराष्ट्रात येणार होता, पण ऐनवेळी तो गुजरातला हलवण्यात आला. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपले मत मांडले, तसेच रिफायनरी प्रकल्पावरुन शिवसेनेवर टीकाही केली.

5 लाख लोकांना रोजगार मिळाला असतादेवेंद्र फडणवीस म्हणाले की, '3 लाख 50 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. या गुंतवणुकीने 5 लाख लोकांना आपण रोजगार देऊ शकलो असतो. सर्व शासकीय ऑईल कंपन्या आणि पार्टनर म्हणून मिडल ईस्टची कंपनी ही रिफायनरी उभारणार होते. गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगरच्या रिफायनरीचा आणि मुंद्रा पोर्टचा मोठा वाटा आहे. जामनगरच्या रिफायनरीपेक्षा चारपट मोठी रिफायनरी राज्यात आली असती.'

शिवसेनेमुळे मोठा प्रकल्प गेला'ही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक होती. या रिफायनरीमुळे महाराष्ट्र खूप पुढे गेला असता. पण त्या रिफायनरीला शिवसेनेने विरोध केला, ती राज्यात होऊ दिली नाही. आम्ही त्यावर विचार कर आहोत, पण आता ती स्केल डाऊन झाली आहे. ती आता साडे तीन लाख कोटीची राहिली नाही. राज्यात होणारी एवढी मोठी गुंतवणूक सेनेने घालवली,' अशी टीका फडणवीसांनी केली. 

येत्या काळात नवीन प्रोजेक्ट आणू'गुजरात भारतातील राज्य आहे, हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलो होते. पण, सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती, त्यामुळे अधिकचा आग्रह करता आला नाही.  पण, आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार,' असे आश्वासनही फडणवीसांनी यावेळी दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना