शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

'देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा हेच सरकारचे खरे लाभार्थी' - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 16:29 IST

मी लाभार्थीच्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधीर करीत आहे. शेतकऱ्याच्या आजही मोठ्या समस्या आहेत। त्यामुळे जनता लाभार्थी झाली नाही.

विटा : मी लाभार्थीच्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधीर करीत आहे. शेतकऱ्याच्या आजही मोठ्या समस्या आहेत। त्यामुळे जनता लाभार्थी झाली नाही. जनतेने मते व सत्ता दिल्याने सरकार लाभार्थी असल्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी झाले असल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

सांगली जिल्ह्यातील कार्वे (विटा) येथील शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, आ. अनिल बाबर, खासदार गजानन कीर्तीकर, नितीन बानूगडे-पाटील, जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर, अमोल बाबर, संजय विभूते उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात नवीन काही तरी घडेल म्हणून जनतेने सरकार बदलले. पण परिस्थिती बदलली नाही. ही परिस्थिती बदलायची असेल तर सांगली जिल्हा भगवा करा. मी महाराष्ट्र भगवा करतो. मी मुख्यमंत्री होणार नाही, पण एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणारच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न लोकशाही मार्गाने सुटले नाहीत तर रस्त्यावर उतरणार आहे.

जनतेला अच्छे दिन येतील म्हणून बिजेपीला पाठींबा दिला. तीन वर्षे झाली. आता मी जेव्हा फिरतोय तेव्हा कळतंय की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी खिल्ली उडवून ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र आहे तेथेच आहे  त्यापेक्षा वाईट परिस्थिती झाली आहे. तीन वर्षांत कशात काही नाही. 1995 च्या जुन्याच पाणी योजना अजून पूर्ण करतोय. 

सरकारला नीट सल्ले देणारे कोणी नाही. वीजदर कमी करण्यासाठी दिलेल्या  मुख्यमंत्रीच्या आदेशाला अधिकारी केराची टोपली दाखवितात. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे की नाही? शेतकरी हा राजा आहे. त्यांचा कोणी छळ करून स्वतःला राजा संजय असेल तर असले संस्थान खालसा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस