शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

'देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा हेच सरकारचे खरे लाभार्थी' - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 16:29 IST

मी लाभार्थीच्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधीर करीत आहे. शेतकऱ्याच्या आजही मोठ्या समस्या आहेत। त्यामुळे जनता लाभार्थी झाली नाही.

विटा : मी लाभार्थीच्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधीर करीत आहे. शेतकऱ्याच्या आजही मोठ्या समस्या आहेत। त्यामुळे जनता लाभार्थी झाली नाही. जनतेने मते व सत्ता दिल्याने सरकार लाभार्थी असल्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी झाले असल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

सांगली जिल्ह्यातील कार्वे (विटा) येथील शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, आ. अनिल बाबर, खासदार गजानन कीर्तीकर, नितीन बानूगडे-पाटील, जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर, अमोल बाबर, संजय विभूते उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात नवीन काही तरी घडेल म्हणून जनतेने सरकार बदलले. पण परिस्थिती बदलली नाही. ही परिस्थिती बदलायची असेल तर सांगली जिल्हा भगवा करा. मी महाराष्ट्र भगवा करतो. मी मुख्यमंत्री होणार नाही, पण एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणारच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न लोकशाही मार्गाने सुटले नाहीत तर रस्त्यावर उतरणार आहे.

जनतेला अच्छे दिन येतील म्हणून बिजेपीला पाठींबा दिला. तीन वर्षे झाली. आता मी जेव्हा फिरतोय तेव्हा कळतंय की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी खिल्ली उडवून ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र आहे तेथेच आहे  त्यापेक्षा वाईट परिस्थिती झाली आहे. तीन वर्षांत कशात काही नाही. 1995 च्या जुन्याच पाणी योजना अजून पूर्ण करतोय. 

सरकारला नीट सल्ले देणारे कोणी नाही. वीजदर कमी करण्यासाठी दिलेल्या  मुख्यमंत्रीच्या आदेशाला अधिकारी केराची टोपली दाखवितात. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे की नाही? शेतकरी हा राजा आहे. त्यांचा कोणी छळ करून स्वतःला राजा संजय असेल तर असले संस्थान खालसा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस