शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

शहरांप्रमाणे शिक्षणाचाही विकास आराखडा हवा - विनोद तावडे; जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीमध्ये ‘युफोरिया’चे धडाक्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 02:01 IST

आपण आपल्या शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करतो. तसाच केंद्र सरकारने शिक्षणाचाही डीपी तयार करावा. सध्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मागणी कमी पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. डीपी तयार असल्यास कोणत्या अभ्यासक्रमाला जास्त मागणी असेल, याचे चित्र स्पष्ट होईल.

यवतमाळ : आपण आपल्या शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करतो. तसाच केंद्र सरकारने शिक्षणाचाही डीपी तयार करावा. सध्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मागणी कमी पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. डीपी तयार असल्यास कोणत्या अभ्यासक्रमाला जास्त मागणी असेल, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची निवड करता येईल. त्यातून सुशिक्षित बेरोजगारांची निराशा टळू शकेल, अशी आशा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१८’ स्नेहसंमेलनाचे तावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विजय दर्डा होते. सचिव किशोर दर्डा, उच्च व तंत्र शिक्षण मंडळाचे विभागीय सहसंचालक डी. व्ही. जाधव, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, समन्वयक डॉ. पी. एम. पंडित, शिवाणी बिहाडे, नितेश धैर्य आदी मंचावर उपस्थित होते.तावडे म्हणाले, जेडीआयईटीच्या रूपाने दर्डा परिवाराने चांगली संस्था उभी केली आहे. असा प्रशस्त कॅम्पस मिळणे ही विद्यार्थ्यांना संधी आहे. इथे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रबंध सादर करण्याची संधी दिली जाते. ती पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यांनाही मिळत नाही. त्यासोबतच आता अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ‘उद्योजक’ बनण्याचेही प्रशिक्षण दिले पाहिजे. पंतप्रधानांच्या ‘स्टार्ट अप इंडिया’साठी ते आवश्यक आहे. त्यावरच आता महाविद्यालयांचे ‘ग्रेडेशन’ ठरणार आहे.लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, आपली शिक्षण पद्धती अमेरिकन पॅटर्ननुसार सुरू आहे. पण आपण अमेरिकन पॅटर्नही पूर्णपणे स्वीकारलेला नाही अन् भारतीय पॅटर्नही पूर्णपणे घेतलेला नाही. आता आपल्याला चायना पॅटर्नकडे जाण्याची गरज आहे. विद्यार्थी केवळ ‘जॉब ओरिएन्टेड’ होताहेत. ‘इनोव्हेशन’ची कमतरता दिसते. आपल्याकडे कौशल्यावर आधारित शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने उच्च शिक्षण घेऊनही बेकारी वाढत आहे. शिक्षण विभागाने यात बदल करावा अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे