शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरांप्रमाणे शिक्षणाचाही विकास आराखडा हवा - विनोद तावडे; जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीमध्ये ‘युफोरिया’चे धडाक्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 02:01 IST

आपण आपल्या शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करतो. तसाच केंद्र सरकारने शिक्षणाचाही डीपी तयार करावा. सध्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मागणी कमी पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. डीपी तयार असल्यास कोणत्या अभ्यासक्रमाला जास्त मागणी असेल, याचे चित्र स्पष्ट होईल.

यवतमाळ : आपण आपल्या शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करतो. तसाच केंद्र सरकारने शिक्षणाचाही डीपी तयार करावा. सध्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मागणी कमी पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. डीपी तयार असल्यास कोणत्या अभ्यासक्रमाला जास्त मागणी असेल, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची निवड करता येईल. त्यातून सुशिक्षित बेरोजगारांची निराशा टळू शकेल, अशी आशा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१८’ स्नेहसंमेलनाचे तावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विजय दर्डा होते. सचिव किशोर दर्डा, उच्च व तंत्र शिक्षण मंडळाचे विभागीय सहसंचालक डी. व्ही. जाधव, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, समन्वयक डॉ. पी. एम. पंडित, शिवाणी बिहाडे, नितेश धैर्य आदी मंचावर उपस्थित होते.तावडे म्हणाले, जेडीआयईटीच्या रूपाने दर्डा परिवाराने चांगली संस्था उभी केली आहे. असा प्रशस्त कॅम्पस मिळणे ही विद्यार्थ्यांना संधी आहे. इथे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रबंध सादर करण्याची संधी दिली जाते. ती पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यांनाही मिळत नाही. त्यासोबतच आता अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ‘उद्योजक’ बनण्याचेही प्रशिक्षण दिले पाहिजे. पंतप्रधानांच्या ‘स्टार्ट अप इंडिया’साठी ते आवश्यक आहे. त्यावरच आता महाविद्यालयांचे ‘ग्रेडेशन’ ठरणार आहे.लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, आपली शिक्षण पद्धती अमेरिकन पॅटर्ननुसार सुरू आहे. पण आपण अमेरिकन पॅटर्नही पूर्णपणे स्वीकारलेला नाही अन् भारतीय पॅटर्नही पूर्णपणे घेतलेला नाही. आता आपल्याला चायना पॅटर्नकडे जाण्याची गरज आहे. विद्यार्थी केवळ ‘जॉब ओरिएन्टेड’ होताहेत. ‘इनोव्हेशन’ची कमतरता दिसते. आपल्याकडे कौशल्यावर आधारित शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने उच्च शिक्षण घेऊनही बेकारी वाढत आहे. शिक्षण विभागाने यात बदल करावा अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे